शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

तालिबानप्रमाणे काश्मीरमध्येही शाळांना केलं जातंय टार्गेट

By admin | Updated: October 27, 2016 13:50 IST

सरकारी आकड्यांनुसार गेल्या तीन महिन्यात एकूण 17 सरकारी आणि तीन खासगी शाळा पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - तालिबान ज्याप्रमाणे शिक्षणाला विरोध करण्यासाठी कट-कारस्थान रचत असतं तसंच काहीसं काश्मीरमधील दहशतवादी करताना दिसत आहेत. काश्मीरमधील शाळा पुर्णपणे बंद राहाव्यात यासाठी शाळेच्या इमारती उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सरकारी आकड्यांनुसार गेल्या तीन महिन्यात एकूण 17 सरकारी आणि तीन खासगी शाळा पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. 
 
8 जुलै रोजी हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीची हत्या झाल्यापासून काश्मीर खो-यातील शाळा बंद आहेत.  खो-यातील तब्बल 20 लाख विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून रोखलं जात असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. सीमारेषेवर स्थित काश्मीरमधील गुरेज, टंगधर आणि उरी तर जम्मू आणि लदाखमधील विद्यार्थ्यांची शाळा मात्र नियमित सुरु आहे. 
 
काश्मीर खो-यात फुटीरतावाद्यांचा इतका प्रभाव नाही आहे. पाकिस्तान समर्थकांनी मंगळवारी दोन सरकारी शाळांना आग लावली. शाळा पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू काश्मीरचे शिक्षण मंत्री अख्तर यांना तर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने धमकी दिली होती. 'आपल्यासाठी काय चांगलं आणि वाईट समजण्याइतपत काश्मीरमधील लोक समजूतदार आहेत. जर अख्तर यांनी माघार घेतली नाही तर त्यांच्याविरोधात आम्हाला कारवाई करावी लागेल', अशी धमकी लष्कर-ए-तोयबाच्या प्रवक्त्यांनी दिली होती.
 
शैक्षणिक संस्था चालू द्याव्यात यासाठी अख्तर यांनी फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्याकडे विनंती केली होती मात्र त्याचा काही फरक पडला नाही. शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी जम्मू आणि दिल्लीला पाठवलं आहे.