शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

‘सूड घ्यायचा तर माझा घ्या, गरिबांचा नव्हे’

By admin | Updated: May 20, 2015 02:23 IST

माझ्यावर सूड उगवताना गरीब आणि शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खा. राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले.

अमेठी : सूड घ्यायचा तर माझा घ्या. कारण यामुळे माझे काहीही नुकसान होत नाही. उलट काम करण्याची प्रेरणा मला मिळले. मात्र, माझ्यावर सूड उगवताना गरीब आणि शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खा. राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले. फूड पार्कच्या मुद्दा राहुल यांनी काहीशा भावनिक पद्धतीने लावून धरला.कामे थांबवून आधीच्या काँगे्रसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यांचे श्रेय लाटण्याची फॅशन भाजप सरकारने स्वीकारली आहे. विरोधी बाकांवर असताना भाजप नेते सर्व पैसा अमेठीत जात असल्याचा आरोप करायचे. आता अमेठीत कुठलेच काम झाले नसल्याची ओरड भाजपने चालवली आहे, अशा शब्दांत मंगळवारी पुन्हा एकदा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. अमेठीच्या तीनदिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संग्रामपूर तहसीलमधील कसारा गावात राहुल बोलत होते. राहुल गांधी यांच्या हस्ते यावेळी खासदार निधीतून केलेल्या ४८ कामांचे लोकार्पण झाले. यात १३ तहसिलींमधील ४४ रस्ते, दोन सभागृहे आणि दोन प्रतीक्षागृहांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)आमच्या सरकारने अमेठीत फूड पार्क आणण्याचा ध्यास घेतला; पण केंद्रातील भाजप सरकारने गतवर्षी आमचे हे स्वपन धुळीस मिळवले. आम्ही विकासाची अनेक कामे केली. सहा राष्ट्रीय महामार्ग तयार केले, अनेक रस्ते बांधले. अमेठी-रायबरेली रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण केले. तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत. कारण भाजप सरकारने विकास कामे थांबवली आहेत आणि आमच्या सरकारने जे काही केले, त्याचे श्रेय लाटण्याचे काम सुरूकेले आहे. भाजप सरकारसाठी ही एक फॅशन झाली आहे. देशात बनणारे सरकार हे सर्वांचे असावे. सरकारने सर्वांसाठी काम करावे, असेच मी सांगेन. कारण विकासाचा लाभ सर्वांना होतो, असे राहुल म्हणाले.