दर महिन्यात जनता दरबार घ्या : अतुल कोटेचा
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
दर महिन्यात जनता दरबार घ्या : अतुल कोटेचा
दर महिन्यात जनता दरबार घ्या : अतुल कोटेचा
दर महिन्यात जनता दरबार घ्या : अतुल कोटेचानागपूर : भारत संचार निगम लिमिटेडची सेवा दिवसेंदिवस ढासळत चालली असून मोबाईल आणि इंटरनेटबाबतच्या समस्यांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात प्रत्येक महिन्यात जनता दरबार घेऊन ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्याची मागणी दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य अतुल कोटेचा यांनी वरिष्ठ महाव्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी मध्य आणि पूर्व नागपुरातील बंद पडलेले दूरध्वनी त्वरित सुरू करून नेटवर्कची समस्या तसेच ऑप्टीकल फायबर केबलने शहर आणि ग्रामीण भागाला जोडण्याची मागणी केली. त्यांनी जनतेच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी दूरसंचार विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आर. एन. पटेल यांनी जिल्ह्यात चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले असून गावापर्यंत ई-कॉमर्स, आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, ई-बँकिंग पोहोचणार असल्याची माहिती दिली.