शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

दहशतवाद्यांविरोधात तात्काळ कारवाई करा, नवाज शरीफांना आली जाग

By admin | Updated: October 6, 2016 12:02 IST

भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अखेर जाग आली असून दहशतवाद्यावंरिोधात तात्काळ कारवाईचे आदेश लष्करला दिले आहेत

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 6 - भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना अखेर जाग आली असून दहशतवाद्यावंरिोधात तात्काळ कारवाईचे आदेश लष्करला दिले आहेत. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा मलीन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर नवाज शरीफ सरकारने लष्करातील वरिष्ठ अधिका-यांना लवकरात लवकर जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. डॉन वृत्तपत्राने हे वृत्त दिलं असून यासंबंधी उच्चस्तरीय बैठक झाल्याची माहिती दिली आहे. 
 
(भारताकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन, नवाज शरीफांच्या उलट्या बोंबा)
  
मंगळवारी अधिका-यांची खासगी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नवाज शरीफ सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि लष्करातील अधिकारी उपस्थित होते. लष्कर अधिका-यांना यावेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्याचा तपास पुर्ण करण्यासाठी तसंच रावळपिंडी न्यायालयात मुंबई हल्ल्यासंबंधी सुरु असलेला खटला लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 
  
(कबड्डी वर्ल्ड कपमधून पाकिस्तान आऊट)
(PoKमध्ये 'पाकिस्तानी दहशतवाद्यां'विरोधात निदर्शने)
 
या बैठकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री सहभागी होते. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अजीज चौधरी यांनी यावेळी प्रेझेंटेशन दिलं. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचे संचालक रिझवान अख्तरही बैठकीत उपस्थित होते.