शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात घ्या सुराज्याचा नवमंत्र

By admin | Updated: August 29, 2016 06:54 IST

लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळात ‘स्वराज्या’चा मंत्र देऊन गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्सवास राष्ट्र जागरणाच्या सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले.

नवी दिल्ली : लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळात ‘स्वराज्या’चा मंत्र देऊन गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्सवास राष्ट्र जागरणाच्या सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले. तेच सूत्र पकडून आता स्वातंत्र्याच्या काळात ‘सुराज हमारा अधिकार है’ हे सूत्र ठेवून सुराज्याला अग्रक्रम देण्याचा संदेश देत, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जावा, अशी कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मांडली.‘आकाशवाणी’वरून झालेल्या २९ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या संदर्भात आपल्या मनातील विचार सविस्तरपणे मांडले. गणपती हा स्वत: विघ्नहर्ता आहे. त्यामुळे ज्याव्दारे प्रदूषणाचे विघ्न निर्माण होईल अशा ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती न बनविता मातीच्या मूर्ती बनवून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी केलेल्या लोकप्रबोधन व समाज जागृतीच्या कामाचा गौरव करून पंतप्रधान म्हणाले की, आज गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. या उत्सवासाठी असंख्य तरुण उत्साहात जोरदार तयारी करतात. सार्वजनिक महत्वाच्या विषयांवर व्याख्याने होतात, निबंध स्पर्धा घेतल्या जातात व रांगोळी स्पर्धांमधूनही असेच विषय हाताळले जातात. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशिक्षणाची एक मोठी मोहिम चालविली जाते. पण आज स्वतंत्र भारतात हा सार्वजनिक उत्सव सुराज्याचा मंत्र देण्यासाठी व त्याचा आग्रह धरण्यासाठी साजरा करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’ऐवजी नैसर्गिक मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे आवाहन करताना मोदी म्हणाले की, उत्सव ही समाजाची शक्ती असते. उत्सवांमुळे व्यक्ती आणि समाजाच्या जीवनात नवे प्राण फुंकले जातात. बदलत्या काळांनुसार उत्सवांचे स्वरूपही बदलण्याची गरज आहे. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या मूर्तींमुळे पर्यावरण ऱ्हास आणि प्रदूषणाचे नवे विघ्न निर्माण न होऊ देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. पर्यावरणाचे रक्षण, नद्या-तलावांचे रक्षण, त्यात होणाऱ्या प्रदूषणापासून छोट्याछोट्या जलचरांचे रक्षण हीसुद्धा ईशवराचीच सेवा आहे आणि निसर्गस्नेही पद्धतीने गणोशोत्सव साजरा करणे हीसुद्धा समाजसेवाच आहे, यावर मोदींनी भर दिला. ‘निसर्गकट्टा’: एक विद्यार्थी चळवळपंतप्रधान मोदींनी गौरव केलेली अकोल्यातील ‘निसर्गकट्टा’ ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली एक चळवळ आहे. गणेशोत्सवात शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी ‘निसर्गकट्टा’ संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो. यासोबतच वृक्षसंवर्धन, पक्ष्यांचे रक्षण, प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती आदी उपक्रम सातत्याने ही संस्थाहाती घेत असते. अमोल सावंत, संदीप वाघाडकर यांनी २00५मध्ये पर्यावरणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी निसर्गकट्टा सुरू केला. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती व पर्यावरणस्नेही गणेशोत्सव यासाठी खूप मेहनत आणि प्रचार घेणाऱ्या महाराष्ट्रातील ज्या व्यक्ती व संस्थांचा विशेष नामोल्लेख करून पंतप्रधानांनी गौरवोद््गार काढले. त्यात पुण्याचे मूर्तिकार अभिजित धोंडफळे व ‘ज्ञान प्रबोधिनी’, कोल्हापूरमधील ‘निसर्गमित्र’ व ‘विज्ञान प्रबोधिनी’, अकोल्याची ‘निसर्गकट्टा’ आणि मुंबईतील गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाचा समावेश होता.