शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पालकांची घ्या काळजी, नाहीतर गमवाल पगार

By admin | Updated: February 8, 2017 13:15 IST

पालकांचा सांभाळ केला नाही तर पगार कापण्यात येईल, असा नवा नियम अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

गुवाहाटी, दि. 8 - आसाममधील भाजपाप्रणीत एनडीए सरकारने त्यांचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. आसामचे अर्थमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, तरुणवर्ण, महिला याव्यतिरिक्त पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 
 
यावेळी शर्मा यांनी सरकारी कर्मचा-यांच्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासंदर्भात एक अनोखा प्रस्तावही सादर केला. जे सरकारी कर्मचारी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणार नाही, त्यांचा सांभाळ करणार नाहीत, अशा कर्मचा-यांच्या पगारातून एका हिस्सा कापला जाईल, आणि तोच हिस्सा त्यांच्या आईवडिलांना देण्यात येईल, असा नवीन नियम यावेळी त्यांनी जाहीर केला. 
 
शर्मा यांनी सांगितले की, 'वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सरकारी सेवेत असणारा कर्मचारी आईवडिलांची काळजी घेऊ शकत नसेल तर सरकारकडून कर्मचा-यांच्या पगारातून काही हिस्सा कापून त्यांच्या आईवडिलांना दिला जाईल'.  
 
दरम्यान, शर्मा यांनी 2017-18 वर्षासाठी राज्याचा  2,349.79 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शैक्षणिक संस्थांसाठी जवळपास 1,000 कोटी रुपये, चहाच्या बागेत काम करणा-या मजुरांसाठी  287 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  शिवाय, तीन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दोन वैद्यकीय महाविद्यालयांसहीत 34 नवीन महाविद्यालयांची घोषणा केली.