शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सर्जिकल स्ट्राईकबाबत बोलताना काळजी घ्या, मोदींच्या मंत्र्यांना कानपिचक्या

By admin | Updated: October 5, 2016 19:20 IST

केंद्रीय मंत्र्यांनी न पडता बोलताना काळजी घेण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईवर शंका उपस्थित होऊ लागल्यानं आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. मात्र या वादात केंद्रीय मंत्र्यांनी न पडता बोलताना काळजी घेण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. उरी येथील लष्करी तळावर पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्षवेधी कारवाई करून दहशतवाद्यांचे ७ प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करून सुमारे ५० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र पाकिस्तानने अशी कारवाई झालीच नसल्याचा कांगावा सुरू केला होता. सुरुवातीला सरकार, लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पाकिस्तानची री ओढत सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईवर शंका उपस्थित केली. या मुद्द्यावरून देशभरात वादाला तोंड फुटले असतानाच काँग्रेस नेते संजय निरुपम आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारवाईबद्दल शंका उपस्थित करून कारवाईचे पुरावे मागितले. यावर भारतीय जनता पक्षाने विरोधकांवर तोंडसुख घेतले. राजकीय पक्षाने लष्करावर शंका घेण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची टीका भाजपने केली. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांसह सहकारी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. लष्कराने या कारवाईचा व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केला असून, हा व्हिडीओ प्रसिद्ध करायचे किंवा नाही, याचा निर्णय पंतप्रधान मोदी घेणार आहेत. त्यांनी मंत्र्यांना या विषयात काहीही न बोलण्याची सूचना केली आहे.