शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

कलंकित मंत्र्यांना थारा नको!

By admin | Updated: August 28, 2014 03:41 IST

ज्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याचा अथवा भ्रष्टाचाराचा खटला सुरू आहे, अशा व्यक्तींना केंद्रात किंवा राज्यात मंत्री होण्यास अपात्र

नवी दिल्ली : ज्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याचा अथवा भ्रष्टाचाराचा खटला सुरू आहे, अशा व्यक्तींना केंद्रात किंवा राज्यात मंत्री होण्यास अपात्र ठरविणारी कोणतीही तरतूद भारतीय राज्यघटनेत नसली, तरी अशा कलंकित व्यक्तींना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान न देणे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर एका अर्थी त्यांची ती जबाबदारीही आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर आणखी एक घणाघात केला.कलंकित मंत्र्यांना थारा देऊ नका, असा स्पष्ट आदेश देण्याचे टाळत सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे नमूद केले, की राज्यघटनेचे विश्वस्त या नात्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक औचित्याचे भान ठेवून अवांच्छित व्यक्तींना मंत्री म्हणून न नेमणे अपेक्षित आहे. न्यायालय म्हणते, की राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाने जनतेचा लोकशाहीवरील विश्वास डळमळत आहे. त्यामुळे राज्यघटनेत स्पष्टपणे म्हटलेले नसले तरी घटनात्मक औचित्य, सुशासन व राज्यघटनेने टाकलेला विश्वास या कसोट्यांवर उतरण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नाही, याचा निर्णय पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी विवेकाने करणे अपेक्षित आहे.न्यायालय म्हणते, की अनेक गोष्टींचा राज्यघटनेत समावेश केलेला नाही. तरीही राज्यघटनेत पोकळी ठेवून ती लागू केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी राज्यघटना जपण्याची शपथ घेतलेली असल्याने त्यांनी मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे याचा सल्ला राष्ट्रपती किंवा राज्यपालांना देताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. (लोकमत न्यूज नेटवर्क)