शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 08:08 IST

T N Seshan: इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते.

नवी दिल्ली : २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचा प्रस्ताव दिला होता. शिवाय स्वत: वेगळी भूमिका वठविण्यास तयार असल्याचा विचार राष्ट्रपतींसमोर मांडून गृहमंत्रिपद सांभाळण्याची तयारी दर्शवली होती. प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांनी आपल्या नव्या पुस्तकात हा दावा केला आहे.

'तेव्हा गोपालकृष्ण गांधी राष्ट्रपती, आर. वेंकटरमन यांचे संयुक्त सचिव होते. श्रीपेरम्बदूर येथे राजीव गांधी यांची एका प्रचारसभेदरम्यान हत्या झाल्यानंतर शेषन यांनीच हत्येचे वृत्त सर्वांत अगोदर राष्ट्रपतींना कळविले होते', असे पुस्तकात नमूद आहे. 

'त्या दिवशी रात्री शेषन लगबगीने राष्ट्रपती भवनात पोहोचले तेव्हा राष्ट्रपतींसोबत त्यांचे सचिव पी. मुरारी, गोपालकृष्ण गांधी उपस्थित होते. तेव्हा शेषन यांनी निवडणुकीबाबत आपले विचार मांडले होते.' 

इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते. या पुस्तकात प्रस्तुत उल्लेख आहेत. 

तेव्हा शेषन म्हणाले होते...

पुस्तकात नमूद संदर्भांनुसार, तेव्हा राष्ट्रपतींसमोर शेषन तत्काळ म्हणाले, ‘निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबवून देशाची सुरक्षा नियंत्रणात आणली पाहिजे. ‘जर आर. वेंकटरमन यांना योग्य वाटले तर गृहमंत्री म्हणून काम करू शकतो,’ अशा शब्दांत शेषन यांनी इच्छा व्यक्त केली होती. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcommissionerआयुक्तHome Ministryगृह मंत्रालयRajiv Gandhiराजीव गांधी