शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 08:08 IST

T N Seshan: इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते.

नवी दिल्ली : २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचा प्रस्ताव दिला होता. शिवाय स्वत: वेगळी भूमिका वठविण्यास तयार असल्याचा विचार राष्ट्रपतींसमोर मांडून गृहमंत्रिपद सांभाळण्याची तयारी दर्शवली होती. प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांनी आपल्या नव्या पुस्तकात हा दावा केला आहे.

'तेव्हा गोपालकृष्ण गांधी राष्ट्रपती, आर. वेंकटरमन यांचे संयुक्त सचिव होते. श्रीपेरम्बदूर येथे राजीव गांधी यांची एका प्रचारसभेदरम्यान हत्या झाल्यानंतर शेषन यांनीच हत्येचे वृत्त सर्वांत अगोदर राष्ट्रपतींना कळविले होते', असे पुस्तकात नमूद आहे. 

'त्या दिवशी रात्री शेषन लगबगीने राष्ट्रपती भवनात पोहोचले तेव्हा राष्ट्रपतींसोबत त्यांचे सचिव पी. मुरारी, गोपालकृष्ण गांधी उपस्थित होते. तेव्हा शेषन यांनी निवडणुकीबाबत आपले विचार मांडले होते.' 

इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते. या पुस्तकात प्रस्तुत उल्लेख आहेत. 

तेव्हा शेषन म्हणाले होते...

पुस्तकात नमूद संदर्भांनुसार, तेव्हा राष्ट्रपतींसमोर शेषन तत्काळ म्हणाले, ‘निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबवून देशाची सुरक्षा नियंत्रणात आणली पाहिजे. ‘जर आर. वेंकटरमन यांना योग्य वाटले तर गृहमंत्री म्हणून काम करू शकतो,’ अशा शब्दांत शेषन यांनी इच्छा व्यक्त केली होती. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcommissionerआयुक्तHome Ministryगृह मंत्रालयRajiv Gandhiराजीव गांधी