शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
4
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
5
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
6
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
7
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
8
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
9
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
10
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
11
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
12
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
13
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
14
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
15
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
16
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
17
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
18
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
19
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
20
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार

'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 08:08 IST

T N Seshan: इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते.

नवी दिल्ली : २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचा प्रस्ताव दिला होता. शिवाय स्वत: वेगळी भूमिका वठविण्यास तयार असल्याचा विचार राष्ट्रपतींसमोर मांडून गृहमंत्रिपद सांभाळण्याची तयारी दर्शवली होती. प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांनी आपल्या नव्या पुस्तकात हा दावा केला आहे.

'तेव्हा गोपालकृष्ण गांधी राष्ट्रपती, आर. वेंकटरमन यांचे संयुक्त सचिव होते. श्रीपेरम्बदूर येथे राजीव गांधी यांची एका प्रचारसभेदरम्यान हत्या झाल्यानंतर शेषन यांनीच हत्येचे वृत्त सर्वांत अगोदर राष्ट्रपतींना कळविले होते', असे पुस्तकात नमूद आहे. 

'त्या दिवशी रात्री शेषन लगबगीने राष्ट्रपती भवनात पोहोचले तेव्हा राष्ट्रपतींसोबत त्यांचे सचिव पी. मुरारी, गोपालकृष्ण गांधी उपस्थित होते. तेव्हा शेषन यांनी निवडणुकीबाबत आपले विचार मांडले होते.' 

इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी बुधवारी या ‘द अनडाइंग लाईट : ए पर्सनल हिस्ट्री ऑफ इंडिपेंडंट इंडिया’चे प्रकाशन केले होते. या पुस्तकात प्रस्तुत उल्लेख आहेत. 

तेव्हा शेषन म्हणाले होते...

पुस्तकात नमूद संदर्भांनुसार, तेव्हा राष्ट्रपतींसमोर शेषन तत्काळ म्हणाले, ‘निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबवून देशाची सुरक्षा नियंत्रणात आणली पाहिजे. ‘जर आर. वेंकटरमन यांना योग्य वाटले तर गृहमंत्री म्हणून काम करू शकतो,’ अशा शब्दांत शेषन यांनी इच्छा व्यक्त केली होती. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcommissionerआयुक्तHome Ministryगृह मंत्रालयRajiv Gandhiराजीव गांधी