शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

आणीबाणीमुळेच संघावर चढली लोकशाहीची झूल

By admin | Updated: October 21, 2015 04:26 IST

देशात आणीबाणी लागू करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चूक केली. कारण आणीबाणीमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना लोकशाहीची झूल पांघरून भारताच्या

हैदराबाद : देशात आणीबाणी लागू करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चूक केली. कारण आणीबाणीमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना लोकशाहीची झूल पांघरून भारताच्या मुख्य राजकीय प्रवाहात येऊ शकली. आणीबाणीचा हाच खरा विघातक परिणाम आहे, असे परखड मत ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले.वृत्तंसस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपले व्यक्तिगत मत मांडताना रमेश म्हणाले की, आणीबाणीमुळे देशातील संसदीय लोकशाहीचा गळा घोटल्याचे दूषण काँग्रेसवर आले व जे मुळात लोकशाहीवादी नाहीत अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासारख्या लोकांना लोकशाहीची झूल पांघरून राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला.त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघास राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हाही आणीबाणीचा घातक परिणाम ठरला. भारतीय जनता पार्टीसारख्या पराकोटीच्या असहिष्णू लोकांना लोकशाहीवादी म्हणून मिरविणेही आणीबाणीमुळेच शक्य झाले, असेही काँग्रेसचे राज्यसभा सदस्य असलेले रमेश म्हणाले.आणीबाणी लागू करण्यामागची पर्स्थििती काय होती हा इतिहास जरी बाजूला ठेवला तरी आणीबाणी लागू करणे चुकीचे होते असेच म्हणावे लागेल. कारण ज्या काँग्रेस पक्षाने देशात संसदीय लोकशाही रुजवली तोच पक्ष लोकशाहीचा मारक म्हणून बदनाम झाला व जी मंडळी मुळात कधीच लोकशाहीवादी नव्हती अशांना लोकशाहीवादी म्हणून वावरण्यास वाव मिळाला.त्यामुळे या दृष्टीने विचार करता आणीबाणी लागू करणे ही इंदिरा गांधीची चूक झाली, असे म्हटले तरी अखेर नेहरुवादी विचारसरणीच वरचढ ठरली, असे रमेश यांचे म्हणणे होते.ते म्हणाले की, ज्या इंदिराजींनी आणीबाणी लादली त्यांनीच आणीबाणीचा फैसलाही केला. इंदिराजींवरील नेहरुवादी विचारांचा पगडाच अखेर वरचढ ठरला. म्हणूनच त्यांनी १९७७ मध्ये स्वत:हून आणीबाणी उठवून निवडखुका जाहीर केल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी जनतेचा कौलही शिरसावंद्य मानला.ज्या मतदारांनी १९७७ मध्ये उंदिरा गांधींना नाकारले त्यांनीच १९८० मध्ये त्यांना पुन्हा सत्तेवर आणले. हेच तर लोकशाहीचे खरे बळ आहे, असेही रमेश म्हणाले. (वृत्तसंस्था)