शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

स्वराज, राजेंना दिलासा

By admin | Updated: June 19, 2015 23:08 IST

मुंबईसह देशाच्या अन्य भागात पावासाने हाहाकार उडाला असला तरी ललित मोदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विदेशमंत्री सुषमा स्वराज

हरिश गुप्ता, नवी दिल्लीमुंबईसह देशाच्या अन्य भागात पावासाने हाहाकार उडाला असला तरी ललित मोदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दिलासा मिळाला आहे. भाजपने अखेर मौन सोडत स्वराज आणि राजे यांची पाठराखण करीत दोघींच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली. ललित वादळाचा जोर ओसरला, असे दिसत असले तरी संसदेच्या पावसाळी अधिवेशात पुन्हा या वादळाला उफाण येण्याची चिन्हे आहेत. सुषमा आणि राजे यांना पदावरून न हटविल्यास पावसाळी अधिवेशन चालू न देण्याचा स्पष्ट इशारा काँग्रेसने दिला आहे.गेल्या पाच दिवसांपासून केंद्र सरकारभोवती ललित मोदी प्रकरणाचे वादळ घोंगावत होते. एवढेच नाही तर चोवीस तास चालणाऱ्या न्यूज चॅनलवरही भाजपच्या या दोन्ही महिला नेत्यांच्या राजकीय भवितव्यावरून चर्चेचे पेव फुटले होते.एकीकडे काँग्रेसने जयराम रमेश यांना मैदानातून उतरवून हा सगळा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांच्या संगनमताने खेळला जात असल्याचा आरोप करून या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. तोच राजस्थान प्रदेश भाजपही तेवढ्याच आक्रमकपणे राजेंच्या समर्थनार्थ सरसावली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर ललितमोदी प्रकरणाचे पडसाद उमटणार असले तरी, आजघडीला मात्र भाजपवरील दडपण काहीसे कमी जरुर झाले आहे. भारतात आपल्यावरून काहूर उठल्यानंतर ललित मोदीसुद्धा लंडनमध्ये तोंडावर बोट धरुन आहेत. सक्तवसुली संचालनालय व इतर तपास संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार असल्यानेच त्यांना गप्प राहणे भाग पडले आहे.पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरविण्यासाठी संसदीय कामकाज व्यवहार समितीची २३ जून रोजी बैठक होत आहे. २० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री या वादावर चर्चा केली. काँग्रेसच्या दडपणापुढे नमते घेण्याऐवजी पक्षपातळीवरच काय तो निर्णय घेणेच, ईष्ट ठरेल, अशा निष्कर्षाप्रत दोघांतील चर्चा झाली.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी सुषमा स्वराज उद्या (शनिवारी) न्यूयॉर्कला जाणार आहेत. राजकीय सूडाचा आरोप...कोच्ची फ्रँचायजीत शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांची हिस्सेदारी असल्याचा भंडाफोड टिष्ट्वटवरून केल्याने राजकीय वादळ उठले होते. काँग्रेसही अडचणीत आली होती. विरोधकांनी रान उठविल्याने अखेर शशी थरूर यांना विदेश राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. याचा राजकीय सूड घेण्यासाठी तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी माझ्या मागे ईडीची चौकशी लावली, असा आरोप ललित मोदी यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.काँग्रेसने मात्र राष्ट्रपती मुखर्जींवर करण्यात आलेला हा आरोप निंदनीय असल्याचे म्हटले आहे.- काँग्रेसने ललित मोदी प्रकरणाला नवे वळण देत शुक्रवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला. छोटे मोदी आणि मोठे मोदी यांच्या संगनमताने हे सर्व प्रकरण घडत आहे, असा आरोप काँग्रेसने केला.- पंतप्रधान मोदींना आपले सरकार आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्वत:चा बचाव करायचा असेल तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याचा इशारा काँग्रेसने दिला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले.