शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

स्वामींना लगाम!

By admin | Updated: June 29, 2016 05:57 IST

भाजपानेही आपले वादग्रस्त खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे दोन कार्यक्रम रद्द करून त्यांच्या वाचेवर लगाम लावला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यानंतर आता भाजपानेही आपले वादग्रस्त खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे दोन कार्यक्रम रद्द करून त्यांच्या वाचेवर लगाम लावला आहे. दुसरीकडे स्वामी यांचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबतचे वक्तव्य आणि त्यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर चालविलेले हल्ले अयोग्य असल्याचे मत मोदींनी व्यक्त केल्यामुळे भाजपाच्या सदस्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.‘व्यवस्थेपेक्षा आपण जास्त मोठे आहोत, असा कुणी विचार करीत असेल तर ती त्याची चूक आहे,’ या मोदींनी दिलेल्या संदेशामुळे सरकार आणि जेटलींवर हल्ले करणारे स्वामी यांच्यावर लगाम लागेल, असा भाजपा सदस्यांचा विश्वास आहे. तथापि स्वामी यांनी राजन, जेटली आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे पक्षाची किती नाचक्की झाली याची भाजपा नेतृत्वाला पुरती जाणीव आहे आणि त्यामुळे स्वामींना लगाम लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. स्वामी यांनी राजन, जेटली आणि अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध जणू मोहीमच उघडली होती. राजन, अरविंद सुब्रमण्यन आणि शक्तिकांत दास या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर त्यांनी अमेरिका समर्थक असा शिक्काही लावला होता. जेटली यांच्याविरुद्ध व्यक्तिगत टीका केली होती. त्यामुळे स्वामींना रोखण्याशिवाय पक्षासमोर पर्यायच उरला नव्हता. (वृत्तसंस्था)>भाजपाची खेळी; निवडला दुसरा मार्गस्वामी वादग्रस्त वक्तव्ये करणे बंद करीत नाहीत आणि त्यांना रोखणे आता कठीण झाले आहे, अशी खात्री पटल्यानंतर भाजपाने दुसरा मार्ग निवडला. स्वामींना बोलूच द्यायचे नाही, असे ठरवून भाजपाने स्वामी प्रमुख वक्ते असलेले दोन कार्यक्रम रद्द केले. यापैकी एक कार्यक्रम रविवारी मुंबईत तर दुसरा कार्यक्रम याच आठवड्यात चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता. हे दोन्ही कार्यक्रम आता रद्द करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम रद्द करून भाजपाने स्वामी यांना कोणत्याही कार्यक्रमात हजर राहू नका किंवा सरकार आणि मंत्र्यांविरुद्ध बोलू नका, असा इशारा दिला आहे. परंतु स्वामींना टिष्ट्वटर आणि अन्य सोशल मीडियावर मत मांडण्यापासून भाजपा कसे रोखणार हा प्रश्न आहे. ‘पंतप्रधानांचा शब्द हा अखेरचा शब्द आहे. त्यामुळे रघुराम राजन यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांबाबतच्या चर्चेला आता आता विराम मिळेल, अशी खात्री आहे.- सिद्धार्थनाथ सिंग, सचिव, भाजपा