शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

स्वामींना लगाम!

By admin | Updated: June 29, 2016 05:57 IST

भाजपानेही आपले वादग्रस्त खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे दोन कार्यक्रम रद्द करून त्यांच्या वाचेवर लगाम लावला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यानंतर आता भाजपानेही आपले वादग्रस्त खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे दोन कार्यक्रम रद्द करून त्यांच्या वाचेवर लगाम लावला आहे. दुसरीकडे स्वामी यांचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबतचे वक्तव्य आणि त्यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर चालविलेले हल्ले अयोग्य असल्याचे मत मोदींनी व्यक्त केल्यामुळे भाजपाच्या सदस्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.‘व्यवस्थेपेक्षा आपण जास्त मोठे आहोत, असा कुणी विचार करीत असेल तर ती त्याची चूक आहे,’ या मोदींनी दिलेल्या संदेशामुळे सरकार आणि जेटलींवर हल्ले करणारे स्वामी यांच्यावर लगाम लागेल, असा भाजपा सदस्यांचा विश्वास आहे. तथापि स्वामी यांनी राजन, जेटली आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे पक्षाची किती नाचक्की झाली याची भाजपा नेतृत्वाला पुरती जाणीव आहे आणि त्यामुळे स्वामींना लगाम लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. स्वामी यांनी राजन, जेटली आणि अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध जणू मोहीमच उघडली होती. राजन, अरविंद सुब्रमण्यन आणि शक्तिकांत दास या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर त्यांनी अमेरिका समर्थक असा शिक्काही लावला होता. जेटली यांच्याविरुद्ध व्यक्तिगत टीका केली होती. त्यामुळे स्वामींना रोखण्याशिवाय पक्षासमोर पर्यायच उरला नव्हता. (वृत्तसंस्था)>भाजपाची खेळी; निवडला दुसरा मार्गस्वामी वादग्रस्त वक्तव्ये करणे बंद करीत नाहीत आणि त्यांना रोखणे आता कठीण झाले आहे, अशी खात्री पटल्यानंतर भाजपाने दुसरा मार्ग निवडला. स्वामींना बोलूच द्यायचे नाही, असे ठरवून भाजपाने स्वामी प्रमुख वक्ते असलेले दोन कार्यक्रम रद्द केले. यापैकी एक कार्यक्रम रविवारी मुंबईत तर दुसरा कार्यक्रम याच आठवड्यात चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता. हे दोन्ही कार्यक्रम आता रद्द करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम रद्द करून भाजपाने स्वामी यांना कोणत्याही कार्यक्रमात हजर राहू नका किंवा सरकार आणि मंत्र्यांविरुद्ध बोलू नका, असा इशारा दिला आहे. परंतु स्वामींना टिष्ट्वटर आणि अन्य सोशल मीडियावर मत मांडण्यापासून भाजपा कसे रोखणार हा प्रश्न आहे. ‘पंतप्रधानांचा शब्द हा अखेरचा शब्द आहे. त्यामुळे रघुराम राजन यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांबाबतच्या चर्चेला आता आता विराम मिळेल, अशी खात्री आहे.- सिद्धार्थनाथ सिंग, सचिव, भाजपा