शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

स्वामी असीमानंद यांच्या जामीनाला आव्हान नाहीच

By admin | Updated: August 11, 2015 19:54 IST

समझौता एख्सप्रेस बॉम्बस्फोटाचे सूत्रधार स्वामी असीमानंद यांच्या जामीनाला आव्हान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ - समझौता एख्सप्रेस बॉम्बस्फोटाचे सूत्रधार स्वामी असीमानंद यांच्या जामीनाला आव्हान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र सरकारच्या या भूमिकेचा फटका भारतालाच बसण्याची चिन्हे असून पाककडून हा मुद्दा उपस्थित केला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. 
समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाचे सूत्रधार स्वामी असीमानंद यांना हरियाणा हायकोर्टाने ऑगस्ट २०१४ मध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे. भाजपाच्या लीगल सेलचे प्रमुख सत्यपाल जैन यांनी असीमानंद यांचे वकिल म्हणून बाजू मांडली होती. असीमानंद यांच्या जामीनाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचे की नाही यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अभ्यास केला. अखेरीस असीमानंद यांच्या जामीनाला आव्हान देण्याची आवश्यकता नाही असे एनआयएने म्हटले आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 
भारत व पाकिस्तानमध्ये लवकरच चर्चा सुरु होणार असून या चर्चेत भारताकडून झकीऊर रहमान लख्वीच्या जामीनाचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. आता पाकनेही स्वामी असीमानंदांच्या जामीनाचा मुद्दा उपस्थित करण्याची तयारी केल्याचे समजते.