शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

संपूर्ण काश्मीर भारताचे सुषमांनी पाकिस्तानला ठणकावले

By admin | Updated: April 5, 2017 21:57 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 -  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले आहे.  गिलगिट आणि बाल्टिस्थानला पाकिस्तानचा पाचवा प्रांत घोषित करण्याच्या पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत सुषमा यांनी पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्थानसह संपूर्ण काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे, असे सांगितले. 
आज लोकसभेमध्ये बीजू जनता दलाचे खासदार भर्तृहरी महताब यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, "पाकिस्तानचे ही आगळीक भारत कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. सरकारसह संपूर्ण सभागृह काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मानते." गेल्या महिन्यात पाकिस्तानने गिलगिट, बाल्टिस्थान हा आपला पाचवा प्रांत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानचा हा दावा तात्काळ फेटाळून लावला होता. 
काश्मीरबाबत लोकसभा आणि राज्यसभेत प्रस्ताव पारीत झालेले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्थानसह पूर्ण काश्मीर भारताचा भाग असल्याचे संसदेने पारीत केलेले आहे. काश्मीरबाबत संसदेने संकल्प केलेला आहे. सोबतच सत्ताधारी पक्षही याबाबत संकल्पबद्ध आहे, असेही सुषमा स्वराज यांनी पुढे सांगितले. आज लोकसभेच्या कामकाजादरम्यान शून्य प्रहरात बीजू जनता दलाचे खासदार महताब यांनी गिलगिट, बाल्टिस्थानला पाकिस्तानने आपला पाचवा प्रांत घोषित केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.