शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सुषमा स्वराज यांची प्रतिमा डागाळली?

By admin | Updated: June 15, 2015 00:21 IST

भारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे एका ‘लीक’ झालेल्या ई-मेलवरून स्पष्ट झाल्यानंतर मोदी सरकारभोवती रविवारी एका नव्या वादाचे वादळ घोंगावत राहिले.सुषमा स्वराज यांच्या या ‘अनैतिक’ कृत्यावरून काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली तर भाजप अध्यक्ष अमित शहा व गृहमंत्री राजनाथ सिंह स्वराज यांच्या बचावासाठी धावले. ‘यात नैतिकतेचा काही प्रश्नच येत नाही,’असे शहा यांनी निवेदन केले तर त्याहून एक पाऊल पुढे जात राजनाथ सिंह म्हणाले, ‘सुषमाजींनी केले ते बरोबरच आहे... सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे, हेही मी स्पष्ट करतो.’ दिवसभरात सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या प्रकरणी चर्चा केली.पण या सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणाचे कवित्व अद्याप संपलेले नाही, हे दिवसभराच्या घटनांवरून स्पष्ट झाले. पेंचप्रसंग तूर्तास टळला असला तरी स्वराज यांनी केलेल्या बचावाच्या टिष्ट्वट्सनंतरही अनुत्तरीत राहिलेले अनेक प्रश्न नजिकच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा पिच्छा पुरवीत राहतील. पी. व्ही. नरसिंह राव, माधव सिंग सोलंकी, एस. एम. कृष्णा व शशी थरूर मंत्री असतानाही हे मंत्रालय असेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.स्वराज दिवसभर पत्रकारांच्या समोर आल्या नाहीत पण किमान डझनभर टिष्ट्वट करून त्यांनी आपले म्हणणे मांडले. त्याने काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही व त्यांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.समाजवादी पक्षासह काही पक्ष स्वराज यांच्या बचावासाठी पुढे आल्याने त्या या वादातून तूर्तास तरी बाहेर येतील. पण सुषमा स्वराज यांचे पती आणि पुतण्याच्या माध्यमातून समोर आलेल्या हितसंबंधांच्या संघर्षाचा विषय विरोधकांना पुढील अनेक दिवस टिकेला मसाला पुरवीत राहील. (या पुतण्याला कीथ वाझ यांच्या मदतीने लंडनच्या एका कॉलेजात प्रवेश मिळाला होता.) या पेंचप्रसंगामुळे मोदी-शहा-जेटली या त्रिमूर्तीला सरकार व पक्षातील नाराज वर्तुळांपासून दूर ठेवणे शक्य होईल, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.लंडनच्या ‘संडे टाइम्स’ने रविवारी जाहीर केलेल्या या वृत्तावरून हे सिद्ध झाले की, ललित मोदींना न्यायालयाने ‘फरार’ घोषित केलेले आहे. भारत सरकारसाठी ते ‘वॉन्टेड’ असूनही पत्नीच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पोर्तुगालला जाऊ देण्याबाबत सुषमा स्वराज ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांश्ी जुलै २०१४ मध्ये सर्वप्रथम बोलल्या होत्या.