शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सुषमा स्वराज यांची प्रतिमा डागाळली?

By admin | Updated: June 15, 2015 00:21 IST

भारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे एका ‘लीक’ झालेल्या ई-मेलवरून स्पष्ट झाल्यानंतर मोदी सरकारभोवती रविवारी एका नव्या वादाचे वादळ घोंगावत राहिले.सुषमा स्वराज यांच्या या ‘अनैतिक’ कृत्यावरून काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली तर भाजप अध्यक्ष अमित शहा व गृहमंत्री राजनाथ सिंह स्वराज यांच्या बचावासाठी धावले. ‘यात नैतिकतेचा काही प्रश्नच येत नाही,’असे शहा यांनी निवेदन केले तर त्याहून एक पाऊल पुढे जात राजनाथ सिंह म्हणाले, ‘सुषमाजींनी केले ते बरोबरच आहे... सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे, हेही मी स्पष्ट करतो.’ दिवसभरात सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या प्रकरणी चर्चा केली.पण या सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणाचे कवित्व अद्याप संपलेले नाही, हे दिवसभराच्या घटनांवरून स्पष्ट झाले. पेंचप्रसंग तूर्तास टळला असला तरी स्वराज यांनी केलेल्या बचावाच्या टिष्ट्वट्सनंतरही अनुत्तरीत राहिलेले अनेक प्रश्न नजिकच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा पिच्छा पुरवीत राहतील. पी. व्ही. नरसिंह राव, माधव सिंग सोलंकी, एस. एम. कृष्णा व शशी थरूर मंत्री असतानाही हे मंत्रालय असेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.स्वराज दिवसभर पत्रकारांच्या समोर आल्या नाहीत पण किमान डझनभर टिष्ट्वट करून त्यांनी आपले म्हणणे मांडले. त्याने काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही व त्यांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.समाजवादी पक्षासह काही पक्ष स्वराज यांच्या बचावासाठी पुढे आल्याने त्या या वादातून तूर्तास तरी बाहेर येतील. पण सुषमा स्वराज यांचे पती आणि पुतण्याच्या माध्यमातून समोर आलेल्या हितसंबंधांच्या संघर्षाचा विषय विरोधकांना पुढील अनेक दिवस टिकेला मसाला पुरवीत राहील. (या पुतण्याला कीथ वाझ यांच्या मदतीने लंडनच्या एका कॉलेजात प्रवेश मिळाला होता.) या पेंचप्रसंगामुळे मोदी-शहा-जेटली या त्रिमूर्तीला सरकार व पक्षातील नाराज वर्तुळांपासून दूर ठेवणे शक्य होईल, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.लंडनच्या ‘संडे टाइम्स’ने रविवारी जाहीर केलेल्या या वृत्तावरून हे सिद्ध झाले की, ललित मोदींना न्यायालयाने ‘फरार’ घोषित केलेले आहे. भारत सरकारसाठी ते ‘वॉन्टेड’ असूनही पत्नीच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पोर्तुगालला जाऊ देण्याबाबत सुषमा स्वराज ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांश्ी जुलै २०१४ मध्ये सर्वप्रथम बोलल्या होत्या.