शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांची प्रतिमा डागाळली?

By admin | Updated: June 15, 2015 00:21 IST

भारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे एका ‘लीक’ झालेल्या ई-मेलवरून स्पष्ट झाल्यानंतर मोदी सरकारभोवती रविवारी एका नव्या वादाचे वादळ घोंगावत राहिले.सुषमा स्वराज यांच्या या ‘अनैतिक’ कृत्यावरून काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली तर भाजप अध्यक्ष अमित शहा व गृहमंत्री राजनाथ सिंह स्वराज यांच्या बचावासाठी धावले. ‘यात नैतिकतेचा काही प्रश्नच येत नाही,’असे शहा यांनी निवेदन केले तर त्याहून एक पाऊल पुढे जात राजनाथ सिंह म्हणाले, ‘सुषमाजींनी केले ते बरोबरच आहे... सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे, हेही मी स्पष्ट करतो.’ दिवसभरात सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या प्रकरणी चर्चा केली.पण या सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणाचे कवित्व अद्याप संपलेले नाही, हे दिवसभराच्या घटनांवरून स्पष्ट झाले. पेंचप्रसंग तूर्तास टळला असला तरी स्वराज यांनी केलेल्या बचावाच्या टिष्ट्वट्सनंतरही अनुत्तरीत राहिलेले अनेक प्रश्न नजिकच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा पिच्छा पुरवीत राहतील. पी. व्ही. नरसिंह राव, माधव सिंग सोलंकी, एस. एम. कृष्णा व शशी थरूर मंत्री असतानाही हे मंत्रालय असेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.स्वराज दिवसभर पत्रकारांच्या समोर आल्या नाहीत पण किमान डझनभर टिष्ट्वट करून त्यांनी आपले म्हणणे मांडले. त्याने काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही व त्यांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.समाजवादी पक्षासह काही पक्ष स्वराज यांच्या बचावासाठी पुढे आल्याने त्या या वादातून तूर्तास तरी बाहेर येतील. पण सुषमा स्वराज यांचे पती आणि पुतण्याच्या माध्यमातून समोर आलेल्या हितसंबंधांच्या संघर्षाचा विषय विरोधकांना पुढील अनेक दिवस टिकेला मसाला पुरवीत राहील. (या पुतण्याला कीथ वाझ यांच्या मदतीने लंडनच्या एका कॉलेजात प्रवेश मिळाला होता.) या पेंचप्रसंगामुळे मोदी-शहा-जेटली या त्रिमूर्तीला सरकार व पक्षातील नाराज वर्तुळांपासून दूर ठेवणे शक्य होईल, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.लंडनच्या ‘संडे टाइम्स’ने रविवारी जाहीर केलेल्या या वृत्तावरून हे सिद्ध झाले की, ललित मोदींना न्यायालयाने ‘फरार’ घोषित केलेले आहे. भारत सरकारसाठी ते ‘वॉन्टेड’ असूनही पत्नीच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पोर्तुगालला जाऊ देण्याबाबत सुषमा स्वराज ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांश्ी जुलै २०१४ मध्ये सर्वप्रथम बोलल्या होत्या.