शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मोलकरीण म्हणून महिलेला सौदीत विकलं, सुषमा स्वराजांनी केली अत्याचारातून सुटका

By admin | Updated: June 1, 2017 13:29 IST

फसवणूक करुन सौदीत विकण्यात आल्यानंतर अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. 1 - फसवणूक करुन सौदीत विकण्यात आल्यानंतर अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे. एका भारतीय महिलेनेच केलेल्या मदतीमुळे या महिलेची सुटका करणं शक्य झालं. सुखवंत कौर असं या महिलेचं नाव असून एका ट्रॅव्हल एजंटने फक्त साडे तीन लाख रुपयांमध्ये तिला एका सौदी अरेबियामधील कुटुंबाला विकले होते. घराकामासाठी या महिलेला विकण्यात आलं होतं. जानेवारी महिन्यात हा सगळा सौदा झाला होता. कुटुंबाकडून महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आले. अनेकदा तिला अन्न न देता भुकेल्या पोटी ठेवण्यात आले. अखेर सुखवंत कौरची तब्बेत बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. 
 
बुधवारी सुखवंत कौर मुंबईला परतली तेव्हा तिने आपल्यावर झालेले अत्याचार आणि संपुर्ण प्रकाराची सविस्त माहिती दिली. "मला रुग्णालयात दाखल केलं असता एका नर्सला माझ्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती मिळाली आणि तिने फोन करुन माझ्या कुटुंबाला माहिती दिली", असं त्यांनी सांगितलं. सुखवंत जालंधर जिल्ह्यातील अजतानी गावातील रहिवासी आहे. "मला जाणुनबुजून पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत काम करायला लावलं जात असे. तसंच मी शाकाहारी असतानाही मांसाहारी खायला दिलं जात होतं", असंही त्या सांगतात.
 
"पतीच्या कमाईवरुन झालेलं भांडण आणि कर्जाचा बोजा यामुळे आपण सौदी अरेबियाला गेलो होतो", असं सुखवंत कौर यांनी सांगितलं आहे. "ट्रॅव्हल एजंट पूजाने माझ्याकडून40 हजार रुपये घेतले होते, आणि भल्या मोठ्या रकमेच्या बदली माझी विक्री केली होती", असंही त्या सांगतात.
 
"ती मला नेहमी फोन करत असे, पण अचानक ते बंद झाल्याने माझी चिंता वाढली. तेथील रुग्णालयामधून मला फोन आला असता तिच्या परिस्थितीची माहिती मिळाली. माझ्या एका मित्राने परराष्ट्र मंत्रालयाला ट्विट करण्याचा सल्ला दिला. देवाच्या कृपेने सुषमा स्वराज यांनी माझ्या ट्विटची दखल घेतली आणि पुढच्या 24 दिवसांत माझी पत्नी घरी परतली", अशी माहिती सुखवंत यांचे पती कुलवंत सिंह यांनी दिली आहे. 
 
भारतीय दुतावासाच्या मदतीने सुखवंत यांनी मुंबईला आणण्यात आलं. त्यांच्याकडे काहीच पैसे नसल्याने सरकारने त्यांची अमृतसरला पोहचवण्याची सोय केली. मुंबई पोलिसांनी ट्रॅव्हल एजंटला अटक केली आहे.