शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

अपहृत ३९ भारतीयांची हत्या झाल्याचे उघड, सुषमा स्वराज यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:50 IST

इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.या सर्वांना नेमके कधी ठार मारण्यात आले हे अद्याप समजू शकले नाही. ते सर्व पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालचे रहिवासी होते. इराकच्या मोसुल शहराजवळील बदूश गावातून हे मृतदेह मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. तेथील एका कंपनीत हे भारतीय नागरिक काम करत होते.मोसुल शहरातून इसिसने ४० भारतीयांचे अपहरण केले होते. यातील एक व्यक्ती बांगलादेशातील मुस्लीम असल्याचे सांगून निसटला होता. उर्वरित ३९ भारतीयांना बदूश येथे नेऊन त्यांची हत्या करण्यात आली. ज्या कंपनीत हे भारतीय काम करत होते त्याच कंपनीने ही माहिती दिली आहे.सुषमा स्वराज यांनी सांगितले की, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी इराकमधील भारतीय राजदूत आणि इराक सरकारच्या एका अधिकाऱ्यासोबत बदूश शहरात जाऊन अपहृत भारतीयांचा शोध सुरू केला, तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की, इसिसच्या दहशतवाद्यांनी काही मृतदेह दफन तिथे केले आहेत. राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले की, रडारच्या माध्यमातून शोध घेतला असता खड्ड्यांमध्ये हे मृतदेह आढळून आले.मृतदेह मिळाले, डीएनए झाले मॅचसुषमा स्वराज यांनी सांगितले की, भारतीय अधिकाºयांनी आपल्या इराकी समकक्ष अधिकाºयांना मृतदेह बाहेर काढण्याची विनंती केली. येथे खोदकाम केल्यानंतर ३९ मृतदेह मिळाले आहेत. याशिवाय, काही ओळखपत्र, बूट आदी वस्तू मिळाल्या आहेत. हे मृतदेह डीएनए चाचणीसाठी बगदादला पाठविण्यात आले आहेत. तपासात ३८ भारतीयांचा डीएनए जुळून आला आहे. तर, ३९ व्या मृतदेहाचा डीएनए नातेवाइकांच्या डीएनएशी ७० टक्के जुळून आला आहे. हे मृतदेह भारतात आणण्यासाठी राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे इराकमध्ये जाणार आहेत.मृतदेह आणण्यासाठी लागू शकतो आठवडाया ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. इराककडून माहितीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.ममता बॅनर्जींनी व्यक्त केले दु:खकोलकाता : इराकमध्ये भारतीय नागरिकांना ठार मारल्याच्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी व्टिट केले आहे की, हे वृत्त ऐकून मी अतिशय दु:खी आहे. शोकाकूल कुटुंबांच्या सांत्वनासाठी शब्द पुरेसे नाहीत.राहुल गांधी यांना धक्काभारतीय नागरिकांच्या मृत्यूचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत असल्याचेही ते म्हणाले.आपने मागितला स्वराज यांचा राजीनामाचंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंंग यांनी भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तर, आम आदमी पार्टीचे कंवर संधू यांनीही घटनेबाबत दु:ख व्यक्त करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज