शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अपहृत ३९ भारतीयांची हत्या झाल्याचे उघड, सुषमा स्वराज यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:50 IST

इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.या सर्वांना नेमके कधी ठार मारण्यात आले हे अद्याप समजू शकले नाही. ते सर्व पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालचे रहिवासी होते. इराकच्या मोसुल शहराजवळील बदूश गावातून हे मृतदेह मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. तेथील एका कंपनीत हे भारतीय नागरिक काम करत होते.मोसुल शहरातून इसिसने ४० भारतीयांचे अपहरण केले होते. यातील एक व्यक्ती बांगलादेशातील मुस्लीम असल्याचे सांगून निसटला होता. उर्वरित ३९ भारतीयांना बदूश येथे नेऊन त्यांची हत्या करण्यात आली. ज्या कंपनीत हे भारतीय काम करत होते त्याच कंपनीने ही माहिती दिली आहे.सुषमा स्वराज यांनी सांगितले की, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी इराकमधील भारतीय राजदूत आणि इराक सरकारच्या एका अधिकाऱ्यासोबत बदूश शहरात जाऊन अपहृत भारतीयांचा शोध सुरू केला, तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की, इसिसच्या दहशतवाद्यांनी काही मृतदेह दफन तिथे केले आहेत. राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले की, रडारच्या माध्यमातून शोध घेतला असता खड्ड्यांमध्ये हे मृतदेह आढळून आले.मृतदेह मिळाले, डीएनए झाले मॅचसुषमा स्वराज यांनी सांगितले की, भारतीय अधिकाºयांनी आपल्या इराकी समकक्ष अधिकाºयांना मृतदेह बाहेर काढण्याची विनंती केली. येथे खोदकाम केल्यानंतर ३९ मृतदेह मिळाले आहेत. याशिवाय, काही ओळखपत्र, बूट आदी वस्तू मिळाल्या आहेत. हे मृतदेह डीएनए चाचणीसाठी बगदादला पाठविण्यात आले आहेत. तपासात ३८ भारतीयांचा डीएनए जुळून आला आहे. तर, ३९ व्या मृतदेहाचा डीएनए नातेवाइकांच्या डीएनएशी ७० टक्के जुळून आला आहे. हे मृतदेह भारतात आणण्यासाठी राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे इराकमध्ये जाणार आहेत.मृतदेह आणण्यासाठी लागू शकतो आठवडाया ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. इराककडून माहितीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.ममता बॅनर्जींनी व्यक्त केले दु:खकोलकाता : इराकमध्ये भारतीय नागरिकांना ठार मारल्याच्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी व्टिट केले आहे की, हे वृत्त ऐकून मी अतिशय दु:खी आहे. शोकाकूल कुटुंबांच्या सांत्वनासाठी शब्द पुरेसे नाहीत.राहुल गांधी यांना धक्काभारतीय नागरिकांच्या मृत्यूचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत असल्याचेही ते म्हणाले.आपने मागितला स्वराज यांचा राजीनामाचंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंंग यांनी भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तर, आम आदमी पार्टीचे कंवर संधू यांनीही घटनेबाबत दु:ख व्यक्त करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज