शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

.... जगण्यासाठी 'ती' गेली 12 वर्ष खात आहे माती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 14:32 IST

उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यामधील रजवाडा गावातील शकुन रायकवार गेली 12 वर्ष माती खाऊन जगत आहे

ऑनलाइन लोकमत - 
बुंदेलखंड, दि. 20 - जगण्यासाठी माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. वस्त्र आणि निवा-याची सोय असेल मात्र अन्नच नसेल तर...? एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस दिवसभर झटत असतो, काबाडकष्ट करत असतो. उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यामधील रजवाडा गावात मात्र एक आदिवासी महिला गेली 12 वर्ष माती खाऊन जगत आहे. शकुन रायकवार असं या महिलेचं नाव आहे. सध्या त्यांचं वय 45 वर्ष आहे. 
 
बुंदेलखंडमधील या जिल्ह्यात उपासमारी आणि कर्जामुळे शेतकरी अगोदरच आत्महत्या करत आहे. सरकारने अनेक आश्वासने दिली आहेत, मात्र येथील परिस्थिती बदलली नसून गंभीर होत चालली आहे. रजवाडा गावात अगोदरच दुष्काळामुळे शेतं कोरडी पडली असताना लोकांच्या पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. दोन वेळचं जेवायला मिळावं यासाठी अनेक लोक भीक मागतात तर काही जण माती खाऊन आपल्या पोटाला आधार देत आहेत. 
 
शकुन रायकवार याच गावाची रहिवासी असून जेव्हा तिला जेवायला काहीच मिळत नाही तेव्हा ती माती खाते. आणि एक दोन नाही तर तब्बल गेली 12 वर्ष त्या माती खात आहेत. माती खाऊन त्यांच्या पोटात दगड तयार झाले आहेत. इतकी वर्ष माती, दगड खाऊनदेखील त्या अजून आश्चर्यकारकरित्या जिवंत आहेत. सहारिया समुदायातील 60 टक्के लोकांनी ललितपूरमधून स्थलांतर केलं आहे. अनेक गावांना वाळवंटाचं स्वरुप आलं आहे. अनेकांनी घराला टाळे ठोकले आहेत. जे मागे राहिले आहेत त्यांच्या जगण्याची काहीच सोय नाही. 
 
शकुन रायकवारला जेव्हा तिच्या माती खाण्याबद्दल विचारलं तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. पतीच्या मृत्यूनंतर सगळच उघड्यावर आलं. दोन मुलं होती पण तीदेखील सोडून गेली. रेशन कार्डपण नाही आहे, लोक जेवायला अन्न देतात पण दुष्काळात तेदेखील कुठपर्यंत मदत करणार. जेव्हा लोकांनी साथ सोडली तेव्हा जमीनीने साथ दिली असं शकुन रायकवार सांगतात.