शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

.... जगण्यासाठी 'ती' गेली 12 वर्ष खात आहे माती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 14:32 IST

उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यामधील रजवाडा गावातील शकुन रायकवार गेली 12 वर्ष माती खाऊन जगत आहे

ऑनलाइन लोकमत - 
बुंदेलखंड, दि. 20 - जगण्यासाठी माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. वस्त्र आणि निवा-याची सोय असेल मात्र अन्नच नसेल तर...? एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस दिवसभर झटत असतो, काबाडकष्ट करत असतो. उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यामधील रजवाडा गावात मात्र एक आदिवासी महिला गेली 12 वर्ष माती खाऊन जगत आहे. शकुन रायकवार असं या महिलेचं नाव आहे. सध्या त्यांचं वय 45 वर्ष आहे. 
 
बुंदेलखंडमधील या जिल्ह्यात उपासमारी आणि कर्जामुळे शेतकरी अगोदरच आत्महत्या करत आहे. सरकारने अनेक आश्वासने दिली आहेत, मात्र येथील परिस्थिती बदलली नसून गंभीर होत चालली आहे. रजवाडा गावात अगोदरच दुष्काळामुळे शेतं कोरडी पडली असताना लोकांच्या पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. दोन वेळचं जेवायला मिळावं यासाठी अनेक लोक भीक मागतात तर काही जण माती खाऊन आपल्या पोटाला आधार देत आहेत. 
 
शकुन रायकवार याच गावाची रहिवासी असून जेव्हा तिला जेवायला काहीच मिळत नाही तेव्हा ती माती खाते. आणि एक दोन नाही तर तब्बल गेली 12 वर्ष त्या माती खात आहेत. माती खाऊन त्यांच्या पोटात दगड तयार झाले आहेत. इतकी वर्ष माती, दगड खाऊनदेखील त्या अजून आश्चर्यकारकरित्या जिवंत आहेत. सहारिया समुदायातील 60 टक्के लोकांनी ललितपूरमधून स्थलांतर केलं आहे. अनेक गावांना वाळवंटाचं स्वरुप आलं आहे. अनेकांनी घराला टाळे ठोकले आहेत. जे मागे राहिले आहेत त्यांच्या जगण्याची काहीच सोय नाही. 
 
शकुन रायकवारला जेव्हा तिच्या माती खाण्याबद्दल विचारलं तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. पतीच्या मृत्यूनंतर सगळच उघड्यावर आलं. दोन मुलं होती पण तीदेखील सोडून गेली. रेशन कार्डपण नाही आहे, लोक जेवायला अन्न देतात पण दुष्काळात तेदेखील कुठपर्यंत मदत करणार. जेव्हा लोकांनी साथ सोडली तेव्हा जमीनीने साथ दिली असं शकुन रायकवार सांगतात.