शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

...तर पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक

By admin | Updated: January 14, 2017 05:26 IST

सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा

जम्मू : सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा करतानाच, गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यास भारतील जवान सज्ज आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे केले. जम्मू व काश्मीरमधील स्थितीविषयी ते म्हणाले की, पाकिस्तान कसे वागतो, यावर सारेकाही अवलंबून आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र पाकिस्तानने कागाळी केली, तर त्यास उत्तर देण्यास आमचे जवान तयार आहेत. पाककडून सुरू असणाऱ्या छुपे युद्ध, घुसखोरी, दहशतवाद या समस्या लगेच संपतील, असे समजण्याचे कारण नाही. तसे व्हायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे लष्कराला सतत सतर्क राहावेच लागेल, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)थेट माझ्याकडे तक्रार करानिमलष्करी दलाच्या काही जवानांसह सैन्याच्या जवानानेही ‘सोशल मीडिया’द्वारे आपल्या समस्यांचा पाढा वाचल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल विपीन रावत यांनी लष्करी मुख्यालयांतील सल्ला-तक्रार पेटीद्वारे थेट माझ्याकडे म्हणणे मांडावे, असे आवाहन सैनिकांना केले आहे. लष्करी जवानाने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून सैनिकांचा अधिकाऱ्यांचे सहायक म्हणून उपयोग करण्यात येत असल्याबद्दल टीका केली होती. रावत यांनी सहायक ही श्रेणी लष्कराचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे स्पष्ट केले.