शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

सत्ताधार्‍यांकडून व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरेश भोळे: मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ

By admin | Updated: February 4, 2016 00:06 IST

जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी गाळेधारकांच्या मोर्चास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबोधीत करताना दिले.

जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी गाळेधारकांच्या मोर्चास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबोधीत करताना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मनपाच्या १४ व्यापारी संकलातील गाळेधारक व्यापार्‍यांचा मोर्चा आल्यानंतर तेथे सभा झाली. यावेळी भोळे बोलत होते. ते पुढे म्हणाले, याप्रश्नी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत लिलावाची पद्धत अवलंबली गेली नाही. महासभांमध्ये गाळेप्रश्नी चर्चा झाल्या, मात्र नोंदी वेगळ्याच असत. त्यामुळे अन्यायाचीच भूमिका या मंडळींची आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत एकत्र रहा. व्यापारी सेवा देण्याचे काम करतात त्यांना त्रास देऊ नका. समन्वयातून मार्ग काढावा अशी आपण सत्ताधार्‍यांना विनंती करू. उत्पन्न वाढीसाठी मनपासमोर अनेक पर्याय आहेत. १७ मजलीतील काही मजले भाड्याने द्या, पडून असलेल्या जागा विका. हेे न करता स्वत:चे पाप दुसर्‍याच्या माथी मारण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे. गरीब जिवांशी खेळू नका असे सांगून १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले. ठरावास मान्यता न दिल्यास अंगाशी येईल, असे सांगून नगरसेवकांनाही या मंडळी घाबरवत असल्याचे त्यांनी सांगून याप्रश्नी एकीने रहा असे व्यापार्‍यांना सांगितले.
हा व्यापार्‍यांवर अन्याय
लिलावाचा ठराव म्हणजे व्यापार्‍यांवर अन्याय असल्याचे कोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांवेळी म्हणाले. एकदा काही गाळेधारकांच्या घरात डोकावून बघा. दिवसाला दिडशे ते दोनशे उत्पन्न मिळविणारा लिलावात भाग घेऊ शकेल काय? असा सवाल करून हा सर्व संकुलातील व्यापार्‍यांचा हा लढा असल्याने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मनपाचे नुकसान न होता ९९ वर्षांच्या कराराचा विचार करावा असेही त्यांनी सांगितले.