शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सत्ताधार्‍यांकडून व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरेश भोळे: मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ

By admin | Updated: February 4, 2016 00:06 IST

जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी गाळेधारकांच्या मोर्चास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबोधीत करताना दिले.

जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी गाळेधारकांच्या मोर्चास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबोधीत करताना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मनपाच्या १४ व्यापारी संकलातील गाळेधारक व्यापार्‍यांचा मोर्चा आल्यानंतर तेथे सभा झाली. यावेळी भोळे बोलत होते. ते पुढे म्हणाले, याप्रश्नी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत लिलावाची पद्धत अवलंबली गेली नाही. महासभांमध्ये गाळेप्रश्नी चर्चा झाल्या, मात्र नोंदी वेगळ्याच असत. त्यामुळे अन्यायाचीच भूमिका या मंडळींची आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत एकत्र रहा. व्यापारी सेवा देण्याचे काम करतात त्यांना त्रास देऊ नका. समन्वयातून मार्ग काढावा अशी आपण सत्ताधार्‍यांना विनंती करू. उत्पन्न वाढीसाठी मनपासमोर अनेक पर्याय आहेत. १७ मजलीतील काही मजले भाड्याने द्या, पडून असलेल्या जागा विका. हेे न करता स्वत:चे पाप दुसर्‍याच्या माथी मारण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे. गरीब जिवांशी खेळू नका असे सांगून १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले. ठरावास मान्यता न दिल्यास अंगाशी येईल, असे सांगून नगरसेवकांनाही या मंडळी घाबरवत असल्याचे त्यांनी सांगून याप्रश्नी एकीने रहा असे व्यापार्‍यांना सांगितले.
हा व्यापार्‍यांवर अन्याय
लिलावाचा ठराव म्हणजे व्यापार्‍यांवर अन्याय असल्याचे कोअर कमेटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांवेळी म्हणाले. एकदा काही गाळेधारकांच्या घरात डोकावून बघा. दिवसाला दिडशे ते दोनशे उत्पन्न मिळविणारा लिलावात भाग घेऊ शकेल काय? असा सवाल करून हा सर्व संकुलातील व्यापार्‍यांचा हा लढा असल्याने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मनपाचे नुकसान न होता ९९ वर्षांच्या कराराचा विचार करावा असेही त्यांनी सांगितले.