शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

जमत नसेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या खा़ सुप्रिया सुळे: सामाजिक अस्थितरतेला सरकार जबाबदार

By admin | Updated: October 5, 2016 00:20 IST

अहमदनगर: दररोज लाखोंच्या संखेने निघणार्‍या मोर्चांनी सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे़ राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे़ मुख्यमंत्र्यांचीही चिडचड वाढली आहे़ त्यांना राज्याचा कारभार करणं जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केले़

अहमदनगर: दररोज लाखोंच्या संखेने निघणार्‍या मोर्चांनी सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे़ राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे़ मुख्यमंत्र्यांचीही चिडचड वाढली आहे़ त्यांना राज्याचा कारभार करणं जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केले़ येथील राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या़ शहरजिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ़ अरुण जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गंुड, आ़संग्राम जगताप, वैभव पिचड, राहुल जगताप, माजी आमदार दादा कळमकर, चंद्रशेखर घुले आदी व्यासपीठावर होते़ सुप्रिया सुळे यांनी सरकारावर सडकून टिका केली़ त्या म्हणाल्या, कोपर्डी येथील एका चिमूरडीवर अमानुषपणे अत्याचार झाला़ या घटनेला तीन महिने पूर्ण होत आले आहेत़ मात्र अद्याप चार्टशीट दाखल होऊ शकली नाही़ विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही चार्टशीट दाखल होत नसेल तर राज्यात काय अवस्था आहे, याची कल्पना येते, असेही त्या म्हणाल्या़ शेती मालाचे भाव पडले आहेत़ कवडीमोल भावाने भाजीपाला विकला जात आहे़ कांदे, बटाटे तर फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे़ दुसरीकडे महिलाही सुरक्षित नाहीत़ लाखोंच्या संखेने मोर्चे निघत असून, राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे़ केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, या दोघांनी मिळून देशाचा बट्ट्याबोळ चालविला आहे़ उरलेसुरले अतिमशहाही अहेतच, बातम्या दडवून ठेवायला, असे सांगून सध्या राज्य अडचणीतून वाटचाल करत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली़़़़़़़़़़़़़़़़़़़मुख्यमंत्री हलक्या कानाचामराठा क्रांती मोर्चोबाबत मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी केलेल्या विधानाबाबत पत्रकांनी छेडले असता मुख्यमंत्री एवढ्या हलक्या कानाचा असेल असे वाटले नव्हते़ प्रस्थापितांविरोधात विस्थापितांचे हे मोर्चे आहेत, असे जर राज्याचा मुख्यमंत्री म्हणत असेल तर ते दुर्देव्य आहे़ सरकार म्हणजे काही लाल दिव्याची गाडी नाही़ म्हणून त्यांची जबाबदार आहे़ इच्छा शक्ती असेल तर ते प्रश्न सोडवू शकतात, असे त्या म्हणाल्या़ ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़विरोधात काम करणार्‍यांचा कार्यक्रमविधानसभेत झालेली चुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, निवडणूकीत विरोधात काम करणार्‍यांचा काय कार्यक्रम करायचा तो करू, असे सांगून जिल्हा परिषदेची चावी राष्ट्रवादीकडेच राहिल, असा निर्धार यांनी यावेळी केला़