शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

वाढदिवशीच होणार याकूबला फाशी, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

By admin | Updated: July 21, 2015 15:24 IST

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून त्याला त्याच्या वाढदिवशीच (३० जुलै) फाशी देण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनची फेरविचार ( क्युरेटिव्ह) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले असून त्याला त्याच्या वाढदिवशीच (३० जुलै) फाशी देण्यात येणार आहे.

मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटप्रकरणात दोषी ठरलेल्या याकूब अब्दुल रझाक मेमनला टाडा कोर्टाने २००७ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. ल्या मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर एप्रिलमध्ये राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने टाडा कोर्टाची परवानगी घेऊन त्याला फाशी देण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू केली होती. मात्र गळ्याभोवती आवळला जाणारा फास टाळण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतील शेवटचा प्रयत्न म्हणून याकूबने सर्वोच्च न्यायालयात 'क्युरेटिव्ह पीटिशन' केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही पीटिशन फेटाळून लावत याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार येत्या ३० जुलै रोजी याकूबला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणा-या सर्वसामान्य नागरिकांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावणारे टाडा कोर्टाचे माजी न्यायाधीश पी. डी. कोडे यांनी दिली आहे.

याकूबने स्वत:च्या बचावासाठी अथक प्रयत्न केले, मात्र अखेर सत्याचा आणि न्यायाचाच विजय झाला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक असून कोर्टाच्या निर्णयाने चांगला संदेश मिळाला आहे, असे मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मांडले.