शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टाला हवे ईव्हीएमप्रकरणी उत्तर

By admin | Updated: March 25, 2017 00:11 IST

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनमध्ये फेरफार करण्यात आल्याचा

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप एका जनहित याचिकेव्दारे करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तर मागितले आहे. वकील एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली असून सॉफ्टवेअर तज्ज्ञांकडून प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.सरन्यायाधीश जे. एस. खेहर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. ए. के. कौल यांच्या पीठाने निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. या याचिकेत असाही आरोप करण्यात आला आहे की, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीत वापरण्यात आलेल्या या मशिनमध्ये सहजासहजी फेरफार केले जाऊ शकतात. अ‍ॅड. एम. एल शर्मा यांनी व्यक्तीगत स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अशीही मागणी करण्यात आली आहे की, एखाद्या राजकीय पक्षाकडून आपल्या स्वार्थासाठी ईव्हीएममध्ये कथित फेरफार केल्याच्या प्रकरणात तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश आणि याबाबतचा अहवाल न्यायालयात दाखल करण्याचे आदेश सरकारला देण्यात यावेत. अर्थात, न्यायालयाने या प्रकरणात केंद्र आणि अन्य पक्षांना नोटीस जारी केली नाही. या पक्षांचाही याचिकेत उल्लेख आहे. याचिकेत असाही दावा केला की, निवडणूक आयोगाने हे मान्य केले आहे की, ईव्हीएममधील तांत्रिक आणि अन्य गोपनीय माहिती जोपर्यंत गोपनीय राहते तोपर्यंत त्यात फेरफार करता येत नाही. या क्षेत्रातील इंजिनिअरच्या माध्यमातून यातील माहिती मिळविली जाऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनवर उमेदवारांचे सद्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो येतात त्याऐवजी रंगीत फोटो प्रिंट करण्यात यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्चन्यायालयाने असहमती दर्शविली. पण, मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. संगीता धिंगरा सहगल यांच्या पीठाने पुढील महिन्यात दिल्ली महापालिकांच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये रंगीत फोटो प्रिंट करण्यात यावेत असे निर्देश देण्यास नकार दिला.या प्रकरणी पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोग आणि दिल्ली निवडणूक आयोग यांच्याकडून हजर असलेल्या वकीलांनी सांगितले की, ईव्हीएमवर रंगीत फोटो प्रिंट करणे आवश्यक नाही. दिल्लीत २३ एप्रिल रोजी महापालिकेसाठी मतदान होत आहे. पदवीचे शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी अनिल कुमार आणि प्रताप चंद्र यांनी ही जनहित याचिका दाखल केली.