शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

निवडणूक आयोगाने ‘घूमजाव’ केल्याने सुप्रीम कोर्ट नाराज

By admin | Updated: July 13, 2017 06:10 IST

निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी करावी का, यावर निवडणूक आयोगाने भूमिका बदलल्याने सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी करावी का, यावर निवडणूक आयोगाने भूमिका बदलल्याने सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.अशी बंदी घातली जावी, यासाठी गाझियाबादचे अश्विनीकुमार उपाध्याय यांनी जनहित याचिका केली आहे. बुधवारी ती सुनावणीसाठी आली असता आयोगाच्या वकिलाने आधी केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विपरीत भूमिका घेतली. त्यावर न्या. रंजन गोगोई व न्या, नवीन सिन्हा यांचे खंडपीठ त्यांना म्हणाले की, तटस्थ राहणे हा पर्याय तुम्हाला असू शकतो का? तुम्ही ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. तसे करण्यात काही बंधने असतील तर आम्हाला सांगा.या याचिकेच्या उत्तरादाखल आयोगाने एप्रिलमध्ये जे प्रतिज्ञापत्र केले होते, त्यात याचिकाकर्त्याच्या निवडणूकबंदीच्या मागणीचे समर्थन होते. त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे मुक्त आणि स्वतंत्र वातावरणात निवडणुका होणे व सुदृढ लोकशाहीशी संबंधित असल्याने आयोगाच्या ते विचाराधीन आहेत. त्यादृष्टीने आयोग निवडणूक सुधारणांचा पाठपुरावा करत आहे.खंडपीठाने आज विचारले तेव्हा मात्र आयोगाच्या वकिलाने वेगळी भूमिका घेतली. त्यांचे म्हणणे होते की, आम्हाला विरोधासाठी विरोध करायचा नाही. पण हा विषय कायदे मंडळाच्या अखत्यारितील असल्याने आम्हाला त्याविषयी काही वेगळे म्हणणे मांडायचे नाही. केंद्र सरकारने याचिकेला विरोध करताना म्हटले आहे की, हा विषय संसदेच्या अधिकार क्षेत्रातील असल्याने याचा निर्णय त्यांनाच करू द्यावा. न्यायालयाने यावर आदेश देऊ नयेत.लोकप्रतिनिधित्व कायद्यात सध्या आजन्म बंदीची तरतूद नाही. फौजदारी गुन्ह्यासाठी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास शिक्षा भोगून झाल्यानंतर त्या व्यक्तीस सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही. मूळ याचिकेत सहभागी होण्यासाठी केलेले अर्ज खंडपीठाने मंजूर केले आणि सुनावणीसाठी १९ जुलै ही तारीख ठरविली.>याचिकाकर्त्यास झापलेअशी निवडणूकबंदी नसणे हा पक्षपात आहे व त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये अभिप्रेत असलेल्या समानतेच्या तत्वाचे उल्लंघन होते, असा मुद्दा याचिकेत आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, सरकारी नोकराला फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाल्यास त्याची नोकरी जाते. मग तोच न्याय राजकारणातील व्यक्तीला का असू नये? यावर, तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने पक्षपाताची तक्रार का करता, असे न्यायाधीशांनी विचारले.