शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

निवडणूक आयोगाने ‘घूमजाव’ केल्याने सुप्रीम कोर्ट नाराज

By admin | Updated: July 13, 2017 06:10 IST

निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी करावी का, यावर निवडणूक आयोगाने भूमिका बदलल्याने सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी करावी का, यावर निवडणूक आयोगाने भूमिका बदलल्याने सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.अशी बंदी घातली जावी, यासाठी गाझियाबादचे अश्विनीकुमार उपाध्याय यांनी जनहित याचिका केली आहे. बुधवारी ती सुनावणीसाठी आली असता आयोगाच्या वकिलाने आधी केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विपरीत भूमिका घेतली. त्यावर न्या. रंजन गोगोई व न्या, नवीन सिन्हा यांचे खंडपीठ त्यांना म्हणाले की, तटस्थ राहणे हा पर्याय तुम्हाला असू शकतो का? तुम्ही ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. तसे करण्यात काही बंधने असतील तर आम्हाला सांगा.या याचिकेच्या उत्तरादाखल आयोगाने एप्रिलमध्ये जे प्रतिज्ञापत्र केले होते, त्यात याचिकाकर्त्याच्या निवडणूकबंदीच्या मागणीचे समर्थन होते. त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे मुक्त आणि स्वतंत्र वातावरणात निवडणुका होणे व सुदृढ लोकशाहीशी संबंधित असल्याने आयोगाच्या ते विचाराधीन आहेत. त्यादृष्टीने आयोग निवडणूक सुधारणांचा पाठपुरावा करत आहे.खंडपीठाने आज विचारले तेव्हा मात्र आयोगाच्या वकिलाने वेगळी भूमिका घेतली. त्यांचे म्हणणे होते की, आम्हाला विरोधासाठी विरोध करायचा नाही. पण हा विषय कायदे मंडळाच्या अखत्यारितील असल्याने आम्हाला त्याविषयी काही वेगळे म्हणणे मांडायचे नाही. केंद्र सरकारने याचिकेला विरोध करताना म्हटले आहे की, हा विषय संसदेच्या अधिकार क्षेत्रातील असल्याने याचा निर्णय त्यांनाच करू द्यावा. न्यायालयाने यावर आदेश देऊ नयेत.लोकप्रतिनिधित्व कायद्यात सध्या आजन्म बंदीची तरतूद नाही. फौजदारी गुन्ह्यासाठी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास शिक्षा भोगून झाल्यानंतर त्या व्यक्तीस सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही. मूळ याचिकेत सहभागी होण्यासाठी केलेले अर्ज खंडपीठाने मंजूर केले आणि सुनावणीसाठी १९ जुलै ही तारीख ठरविली.>याचिकाकर्त्यास झापलेअशी निवडणूकबंदी नसणे हा पक्षपात आहे व त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये अभिप्रेत असलेल्या समानतेच्या तत्वाचे उल्लंघन होते, असा मुद्दा याचिकेत आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, सरकारी नोकराला फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाल्यास त्याची नोकरी जाते. मग तोच न्याय राजकारणातील व्यक्तीला का असू नये? यावर, तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने पक्षपाताची तक्रार का करता, असे न्यायाधीशांनी विचारले.