शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

वाहनांबाबत केंद्राकडे सुप्रीम कोर्टाने मागितले उत्तर; शिफारशींवर अंमल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:46 IST

या संस्थांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडताना म्हटले की, २०१२ मध्ये सरकारने एनईएमएमपी जाहीर केले होते.

नवी दिल्ली : नॅशनल ई-मोबिलिटी मिशन प्लॅन (एनईएमएमपी), २०२० ची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी केलेल्या सार्वजनिक हित याचिकेवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून शुक्रवारी उत्तर मागितले आहे.

एनईएमएमपीने सगळी सार्वजनिक वाहने आणि सरकारी वाहने प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांत (ईव्ही) रूपांतरित करण्याची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेत भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि संबंधित पक्षांच्या मंत्र्यांना प्रतिवादी करून घेण्याचा निर्णय घेतला आणि चार आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली.नागरिकांचा आरोग्य आणि स्वच्छ पर्यावरण हा हक्क घटनेतच असतानाही हवामान बदल आणि हवेच्या प्रदूषणाबाबत सरकारच्या बेपर्वाईमुळे तो उल्लंघला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुराला यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि सूर्या कांत यांचा या खंडपीठात समावेश होता. स्वयंसेवी संस्था सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, कॉमन कॉज आणि सीता राम जिंदाल फाऊंडेशन यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या संस्थांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडताना म्हटले की, २०१२ मध्ये सरकारने एनईएमएमपी जाहीर केले होते. त्यात सरकारी वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीची वाहने यांच्यासह इतर वाहने इलेक्ट्रिक करणे आणि इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यासह अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्या मोहिमेने इलेक्ट्रिकवाहने खरेदी केल्यावर करात सवलत व प्रोत्साहनपर काही देण्याचीही शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर अपार्टमेंटस्, इमारती, पार्किंगच्या जागा, सरकारी कार्यालये, मॉल्स इत्यादी ठिकाणी वेगाने व सामान्य चार्जिंग पॉइंटस्च्या पायाभूत सुविधा आवश्यक उपलब्ध करण्याचेही त्यात नमूद केले गेले आहे. सरकार ही योजना यशस्वीपणे राबवू शकलेले नाही, असे भूषण म्हणाले.