शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाहनांबाबत केंद्राकडे सुप्रीम कोर्टाने मागितले उत्तर; शिफारशींवर अंमल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:46 IST

या संस्थांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडताना म्हटले की, २०१२ मध्ये सरकारने एनईएमएमपी जाहीर केले होते.

नवी दिल्ली : नॅशनल ई-मोबिलिटी मिशन प्लॅन (एनईएमएमपी), २०२० ची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी केलेल्या सार्वजनिक हित याचिकेवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून शुक्रवारी उत्तर मागितले आहे.

एनईएमएमपीने सगळी सार्वजनिक वाहने आणि सरकारी वाहने प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांत (ईव्ही) रूपांतरित करण्याची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेत भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि संबंधित पक्षांच्या मंत्र्यांना प्रतिवादी करून घेण्याचा निर्णय घेतला आणि चार आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली.नागरिकांचा आरोग्य आणि स्वच्छ पर्यावरण हा हक्क घटनेतच असतानाही हवामान बदल आणि हवेच्या प्रदूषणाबाबत सरकारच्या बेपर्वाईमुळे तो उल्लंघला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुराला यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि सूर्या कांत यांचा या खंडपीठात समावेश होता. स्वयंसेवी संस्था सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, कॉमन कॉज आणि सीता राम जिंदाल फाऊंडेशन यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या संस्थांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडताना म्हटले की, २०१२ मध्ये सरकारने एनईएमएमपी जाहीर केले होते. त्यात सरकारी वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीची वाहने यांच्यासह इतर वाहने इलेक्ट्रिक करणे आणि इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यासह अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्या मोहिमेने इलेक्ट्रिकवाहने खरेदी केल्यावर करात सवलत व प्रोत्साहनपर काही देण्याचीही शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर अपार्टमेंटस्, इमारती, पार्किंगच्या जागा, सरकारी कार्यालये, मॉल्स इत्यादी ठिकाणी वेगाने व सामान्य चार्जिंग पॉइंटस्च्या पायाभूत सुविधा आवश्यक उपलब्ध करण्याचेही त्यात नमूद केले गेले आहे. सरकार ही योजना यशस्वीपणे राबवू शकलेले नाही, असे भूषण म्हणाले.