शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

अरुणाचलच्या तिढ्यात सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप

By admin | Updated: January 28, 2016 01:11 IST

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाची आता सर्वोच्च न्यायालय समीक्षा करणार आहे. ‘हा अतिशय गंभीर मुद्दा आहे,’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाची आता सर्वोच्च न्यायालय समीक्षा करणार आहे. ‘हा अतिशय गंभीर मुद्दा आहे,’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणारे राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतच्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आलेले नाही, असा आक्षेप अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी घेतल्यानंतर न्या. जे.एस. केहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वरीलप्रमाणे टिप्पणी केली. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी रात्री शिक्कामोबर्तब केले होते. ‘नियम हे शेवटी नियम आहेत आणि ते सर्वांना समान लागू आहेत,’ असे आग्रही प्रतिपादन रोहतगी यांनी केले तेव्हा, ‘तांत्रिक आक्षेप उपस्थित करू नका,’ असे घटनापीठाने त्यांना स्पष्टपणे सांगितले. निलंबनावस्थेत ठेवण्यात आलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेतील काँगे्रस विधिमंडळ पक्षनेते राजेश ताचो यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यपाल राजखोवा यांना नोटीस जारी करीत शुक्रवारपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. घटनापीठाने सुनावणीसाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली.इटानगर : राज्यपालांनी शासनसूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची अधिसूचना येताच राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी राज्य शासनाची सूत्रे हाती घेतली.