शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाेच्च न्यायालयाने दिला डॉ. आंबेडकरांचा दाखला

By admin | Updated: August 28, 2014 02:22 IST

‘संपुआ’च्या पहिल्या सरकारमध्ये आरोपपत्र दाखल असलेल्या लालू प्रसाद यादव, मोहम्मद तसलिमुद्दीन, एम. ए. ए. फातमी आणि जय प्रकाश यादव या चार मंत्र्यांना सामील केले

नवी दिल्ली : ‘संपुआ’च्या पहिल्या सरकारमध्ये आरोपपत्र दाखल असलेल्या लालू प्रसाद यादव, मोहम्मद तसलिमुद्दीन, एम. ए. ए. फातमी आणि जय प्रकाश यादव या चार मंत्र्यांना सामील केले गेल्यानंतर २००५ मध्ये मनोज नरुला या वकिलाने केलेल्या जनहित याचिकेवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सदसद््विवेकाचा वापर करण्याची अपेक्षा ठेवणारा निकाल दिला गेला. त्यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखलाही विशेषत्वाने दिला आहे. राज्यघटनेच्या मसुद्यावर घटनासभेत चर्चा सुरु असताना काही सदस्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला मंत्री होण्यास अपात्र ठरवावे, अशा दुरुस्त्या मांडल्या होत्या. परंतु राज्यघटनेच्या एकूणच रचनेत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जे जबाबदारीचे अग्रगण्य स्थान दिले आहे ते पाहता मुद्दाम अशी तरतूद करणे अनावश्यक आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री संसद/ विधिमंडळास उत्तरदायी असतात व त्यांच्या कामावर जनतेचा जागता पाहरा असणार आहे. त्यामुळे या उच्च पदांवरील व्यक्ती पूर्ण जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा ठेवून याविषयी विवेकपूर्ण निर्णय घेतील, अशी अपेक्षा ठेवायला हवी, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केले होते. ‘कलंकित’ मंत्र्यांच्या बाबतीत राज्यघटनेची पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडून काय अलिखित अपेक्षा आहे, हे सांगताना न्यायालयाने डॉ. आंबेडकर यांच्या या मताचा दाखला दिला.खंडपीठात सरन्यायाधीश न्या. लोढा यांच्याखेरीज न्या. दीपक मिश्रा, न्या. शरद बोबडे, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश होता. न्या. मिश्रा यांनी स्वत: सरन्यायाधीश व न्या. बोबडे यांच्या वतीने ८८ पानांचे मुख्य निकालपत्र दिले. न्या. लोकूर व न्या. जोसेफ यांनी अनुक्रमे २७ आणि आठ पानांची सहमतीची पण स्वतंत्र निकालपत्रे लिहिली. मुख्य निकालपत्रात न्या. मिश्रा म्हणतात की, राज्यघटनेच्या अनुच्छेद ७५ व १६१ मध्ये मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अथवा न करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मर्यादांचा अथवा अपात्रतेचा उल्लेख नाही. त्यामुळे गुन्हेगारी खटला सुरु असलेल्यांना मंत्री करू नका, असा आदेश देऊन न्यायालय राज्यघटनेत नसलेली अपात्रता अंतर्भूत करू शकत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)