शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

उत्तराखंडबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

By admin | Updated: April 19, 2016 04:24 IST

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणारी जनहित याचिका खारीज केली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणारी जनहित याचिका खारीज केली आहे. विधानसभेत शक्तिप्रदर्शनासाठी आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याबाबत सीबीआय चौकशीची मागणीही या याचिकेत केली होती. दुसरीकडे उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने राज्यपालांनी हस्तक्षेप करायला नको होता, या शब्दांत फटकारले आहे.२७ मार्च रोजी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर काही तासांतच विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले होते. त्याच दिवशी या आमदारांनी उच्च न्यायालयात अपात्रतेला आव्हान दिले. विधानसभा आधीच निलंबित असताना आणि कलम ३५६ लागू झाल्यानंतर या आमदारांना अपात्र ठरविण्याच्या कुंजवाल यांच्या कृतीबाबत वैधतेचा प्रश्न या आमदारांनी न्या. यू.सी. ध्यानी यांच्या एकलपीठाकडे उपस्थित केला होता.केंद्र सरकारने नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविल्याची चिंता करणे तसेच केवळ अपवादात्मक परिस्थितीतच हस्तक्षेप केला जात असताना आवश्यकता नसताना तशी कृती करणे पूर्णपणे विसंगत ठरते, असेही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले. २८ मार्च रोजी शक्तिपरीक्षा होऊ घातली होती तेव्हा नऊ आमदारांच्या बंडखोरीमुळे बदललेल्या परिस्थितीत काय घडते ते पाहणे हे केंद्र सरकारच्या हाती असताना एखाद्या राज्यात अन्य पक्षाचे सरकार असल्यामुळे बदलत्या परिस्थितीबाबत चिंता करणे हे पूर्णपणे विसंगत ठरत नाही काय, असा सवाल खंडपीठाने अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना केला.अधिकारांवर अतिक्रमण नको... :विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक अधिकारी असून राज्यपालांनी त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करायला नको होते, असे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ आणि न्या. व्ही. के. बिस्त यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सोमवारी दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने म्हटले की, राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासारख्या घटनात्मक प्रमुखांच्या अधिकारांबाबत सीमारेषा आखून देण्यात आल्या आहेत. त्यांनी परस्परांच्या अधिकारांवर घाला घालू नये. मतविभाजनाबाबत आमदारांनी दिलेल्या निवेदनावर राज्यपाल के.के. पॉल यांनी विधानसभाध्यक्ष कुंजवाल यांना पत्र पाठवायचे टाळणे हेच चांगले राहिले असते.