शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दलितांवरील बहिष्कार संपविण्याचा आदेश अशक्य सुप्रीम कोर्ट : न्यायालयीन आदेश निष्प्रभ ठरेल

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

नवी दिल्ली : दलित समुदायावरील कथित सामाजिक बहिष्कार न्यायालयाच्या आदेशाद्वारे संपवता येणे शक्य नाही, असे सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. हरियाणातील मिर्चपूर या हिंसाचारग्रस्त गावातील दलित समुदायावरील बहिष्कार संपविण्याचा आदेश देता येणार नाही कारण असा आदेश निष्प्रभ ठरेल, असे एम. बी. लोकूर आणि यू. यू. ललित या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : दलित समुदायावरील कथित सामाजिक बहिष्कार न्यायालयाच्या आदेशाद्वारे संपवता येणे शक्य नाही, असे सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. हरियाणातील मिर्चपूर या हिंसाचारग्रस्त गावातील दलित समुदायावरील बहिष्कार संपविण्याचा आदेश देता येणार नाही कारण असा आदेश निष्प्रभ ठरेल, असे एम. बी. लोकूर आणि यू. यू. ललित या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
सामाजिक बहिष्कार संपविण्यासाठी काय तोडगा असू शकतो? दलितांवरील बहिष्कार संपवा, असे न्यायालय सांगू शकत नाही. तसा आदेश दिला तरी त्याचा परिणाम होणार नाही, असे न्यायाधीशांनी एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सांगितले.
रोहतक जिल्ह्यातील मिर्चपूर येथील दलित समुदायाचे पुनर्वसन करण्यासह त्यांच्यासाठी वेगळे ठिकाण देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली होती. २०१० मध्ये जात समुदायाने या गावातील दलित वृद्ध आणि त्याच्या अपंग मुलीची हत्या केली होती. हरियाणा सरकारने या प्रकरणी चौकशीसाठी न्या. इक्बाल सिंग यांच्या आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाकडून अहवाल मिळाला काय याची माहिती देण्याचा आदेश खंडपीठाने सरकारी वकिलांना दिला.
दलित समुदायाची बाजू मांडताना वकील कोलिन गोनसाल्वेस म्हणाले की, या प्रकरणी जाट समुदायातील काहींना दोषी ठरविण्यात आल्यामुळे दलित समुदाय कायम भीतीच्या सावटात वावरत आहे. काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून खटल्याचा निकाल प्रलंबित आहे. त्यावर सरकारी वकील म्हणाले की, या गावात २०१० पासून सीआरपीएफची एक तुकडी कायम तैनात असून दलितांना संरक्षण दिले जात आहे.
-------------------
कुत्रा भुंकला म्हणून भांडण
दलित वस्तीतून जात असलेल्या जाट समुदायाच्या एका गटावर कुत्रा भुंकला असता एका जाट युवकाने त्याला दगड मारल्याने वाद निर्माण झाला. दोन दिवसानंतर २१ एप्रिल २०१० रोजी जाट समुदायाने घराला आग लावली असता ताराचंद हा ७० वर्षीय वृद्ध आणि त्याच्या अपंग मुलीला घराबाहेर पडता आले नव्हते, होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
-------------------
समाजाला कलंक
याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ही हत्या नसल्याचा निर्णय दिल्याकडे तत्कालीन काँग्रेस सरकारने लक्ष वेधल्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने संताप व्यक्त करीत हा समाजाला कलंक असल्याचे स्पष्ट केले. दिल्ली कनिष्ठ न्यायालयाने ९७ पैकी ८२ आरोपींना निदार्ेष सोडले तर १५ जणांना घराला आग लावल्याबद्दल दोषी ठरविले असून तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ५ जणांना पाच ते सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ७ जण सध्या वर्षभरासाठी सुटीवर मुक्त आहेत.