शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

बैलांच्या शर्यतीवर सुप्रीम कोर्टाची बंदी

By admin | Updated: May 7, 2014 19:28 IST

गेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूत प्रसिद्ध असलेल्या 'जल्लीकट्टू'या बैलांची झुंज व शर्यतीच्या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि.७ - गेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूत प्रसिद्ध असलेल्या 'जल्लीकट्टू'  या बैलांची झुंज व शर्यतीच्या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. हे खेळ म्हणजे प्राणीविरोधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे नमूद करत न्या. के. एस. राधाकृष्णन आणि पिनाकी घोस यांनी बंदीचे आदेश दिले आहेत.  न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त करत पेटाच्या (पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स)प्रवक्त्यांनी हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. या खेळामुळे आत्तापर्यंत अनेक प्राणी व माणसांना त्रास सहन करावा लागला, प्रसंगी जीवही गमवावा लागल्याचे सांगत हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

यापर्वी जानेवारी २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेवर बंदी आणली होती, मात्र  मात्र योग्य त्या मार्गदर्शक नियमांचे पालन केल्यास हा खेळ खेळता येऊ शकेल असे सांगत ही बंदी अवघ्या चार दिवसांत  उठवली होती.  या खेळावरील बंदीमुळे जनभावना दुखावल्या जातील असे सांगत राज्य सरकारने या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. तसेच योग्य ती काळजी घेऊन हा खेळ खेळला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयाला दिले. त्यानंतर २०११ साली तमिळनाडू राज्य सरकारने 'जल्लीकट्टू' महोत्सवादरम्यान होणा-या अपघातांवर नियंत्रण यावे म्हणून कायदा संमत  केला होता. मात्र त्यानंतरही दरवर्षी अनेक लोक या खेळात जखमी झाले तसेच मृत्युमुखीही पडले.   अखेर सर्वोच्च न्यायालयाने या खेळावरील बंदीचा निर्णय कायम ठेवला.