शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कॅन्सर रुग्णाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मोबाईल टॉवर केला बंद

By admin | Updated: April 12, 2017 10:15 IST

सर्वोच्च न्यायालयानं कॅन्सर रुग्णाच्या याचिकेवर चक्क मोबाईल टॉवर बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - मोबाईल टॉवरमधून निघणा-या तरंग लहरींमुळे कॅन्सरसारखा जीवघेणा आजार जडतो, असा अनेक तज्ज्ञांचा कयास असतो. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं कॅन्सर रुग्णाच्या याचिकेवर चक्क मोबाईल टॉवर बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 42 वर्षांच्या हरिश चंद तिवारी यांना घराजवळ असलेल्या मोबाईल टॉवरमधून येणा-या तरंग लहरींमुळे "हॉजकिन्स लिम्फोमा"(एक प्रकारचा कॅन्सर) झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी हे पुराव्यानिशी कोर्टात सिद्ध केलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोबाईल टॉवरच बंद करण्याचा आदेश दिला आहे. ग्वालियारमध्ये राहणा-या हरिश चंद तिवारी यांनी गेल्या वर्षी त्यांची वकील निवेदिता शर्मा हिच्या मदतीनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. याचिकेत हरिश म्हणाले होते की, शेजारील घरावर 2002मध्ये अवैधरीत्या बीएसएनएलचा मोबाईल टॉवर लावण्यात आला आहे. या मोबाईल टॉवरमधून निघणा-या तरंग लहरींमुळे 14 वर्षांपासून आम्हाला दुष्परिणामांना सामोरं जावं लागतंय. शेजा-यांचं घर 50 मीटरपेक्षाही कमी अंतरावर असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि नवीन सिन्हा यांच्या खंडपीठासमोर झाली असता, त्यांनी 7 दिवसांच्या आत बीएसएनएलला टॉवर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी गेल्या वर्षी 18 मार्च 2016ला सुनावणी झाली होती. तसेच याचिकाकर्त्यांनं या हानिकारक तरंग लहरींमुळे पशु आणि पक्ष्यांच्या जीव जात असल्याचंही सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. मात्र सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारनं या आरोपांचं जोरदार खंडन केलं आहे. या सर्व गोष्टी वैज्ञानिक अभ्यासातून सिद्ध झाल्या नसल्याचं त्यांनी न्यायालयानं सांगितलं आहे.  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टेलिकॉम विभागानं सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. यात देशात 12 लाखांहून अधिक मोबाईल टॉवर असल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच टेलिकॉम विभागानं आतापर्यंत 3.30 लाख मोबाईल टॉवरचं परीक्षण केलं असून, फक्त 212 टॉवर्सच्या तरंग लहरी क्षमतेपेक्षा जास्त हानिकारक असल्याची माहिती दिली आहे. त्या कंपन्यांकडून 10 लाखांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती टेलिकॉम विभागानं प्रतिज्ञापत्रात दिली आहे.