शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिमकार्डसाठीही ‘आधार’सक्ती!

By admin | Updated: March 27, 2017 04:47 IST

सध्याच्या सर्व मोबाइलधारकांना ‘आधार’वर आधारित ई-केवायसी करावी लागणार आहे. हे सत्यापन करण्यास दूरसंचार

नवी दिल्ली : सध्याच्या सर्व मोबाइलधारकांना ‘आधार’वर आधारित ई-केवायसी करावी लागणार आहे. हे सत्यापन करण्यास दूरसंचार कंपन्यांनी प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. दूरसंचार सेवा देणाऱ्या आॅपरेटर्सची संघटना सीओएआयने म्हटले आहे की, आमच्या सदस्य कंपन्या याबाबत लवकरच एक बैठक घेतील. सध्याच्या एक अब्जपेक्षा अधिक मोबाइल ग्राहकांच्या सत्यापन प्रक्रियेसाठी या वेळी चर्चा करण्यात येईल. दूरसंचार विभागाने एका अधिसूचनेद्वारे सांगितले आहे की, सर्व लायसन्सधारक कंपन्यांनी सर्व ग्राहक (प्रीपेड आणि पोस्टपेड) यांचे ‘आधार’वर आधारित ई-केवायसीच्या माध्यमातून सत्यापन करावे. सर्व कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि एसएमएसद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची सूचना द्यावी लागेल. या प्रक्रियेची माहिती वेबसाइटवरही द्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीत एक आदेश दिला होता. यात न्यायालयाने म्हटले होते की, मोबाइल फोन ग्राहकांचा पत्ता आणि ओळख निश्चित करण्यासाठी एक प्रभावी प्रक्रिया विकसित झाली आहे. एक वर्षाच्या आत ही सत्यापन प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. (लोकमत न्यूज नेटवर्क)कंपन्यांना १ हजार कोटींचा खर्चदूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे की, यासाठी कंपन्यांनी अशी प्रक्रिया अवलंबवावी जेणेकरून लांब रांगांपासून दूर राहता येईल. याबाबत सीओएआयने म्हटले आहे की, दूरसंचार उद्योग या निर्णयाचे स्वागत करत आहे. पण, या प्रक्रियेसाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे व कंपन्यांना हा खर्च करावा लागणार आहे.  संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज म्हणाले की,  यामुळे बनावट ग्राहक समाप्त होतील. एक वर्षाच्या या काळात काम पूर्ण न झाल्यास आम्ही दूरसंचार विभागाला मुदत वाढवून मागू.