शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी

By admin | Updated: July 6, 2017 13:50 IST

जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. चिनी सरकारच्या मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये हिमालयामधील देशांना भारताने आपल्या मागे ओढू नये असा सूर उमटला आहे. संपादकीयामध्ये भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा देईल असे म्हटले आहे.
भारत सीमाभागामध्ये आगळिक करत असून त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागेल अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे. चीनमधील सरकारी मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेला सूर हा चिनी सरकारची अधिकृत भूमिका मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर सिक्कीम सीमेवर भारत चीनमध्ये असलेला वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सिक्कीममधील जनतेने याआधी 1960 व 1970 मध्ये स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने केली परंतु ती निर्दयीपणे चिरडण्यात आल्याचा हास्यास्पद दावाही चीनने केला आहे. भारताने 1975 मध्ये सिक्कीमच्या राजाला पदच्यूत केले आणि सिक्कीमला भारतात जोडले असा दाखला संपादकीयात देण्यात आला आहे.
भारत तिबेट व दलाई लामांचा विषय काढेल हे गृहीत धरून चिनी प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेकवेळा काढून झालेला आहे आणि आता त्यात नवीन भर टाकण्यासारखे काही नसल्याचा दावाही केला आहे. जर चीनने भारताशी असलेल्या संबंधांचा पुनर्विचार केला तर भारताला ते महागात जाईल अशी धमकी पुन्हा एकदा चीनने दिली आहे. 
काही दिवसांपूर्वी 1962 च्या युद्धाचा दाखला देत भारताने इतिहासापासून बोध घ्यावा अशी धमकी चीनने दिली होती.
 
आणखी वाचा
 
 
भारतामध्ये प्रवास करणाऱ्या चिनी प्रवाशांना ट्रॅव्हेल अॅलर्ट देण्याचा विचार करत असल्याचेही चीनने म्हटले आहे. 1890 मध्ये इंग्लंड व चीनमध्ये झालेल्या कराराचा भारत भंग करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. 
चीन सिक्कीम सीमेवरील डोंगलाँग या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता बांधत असून भारताने याला आक्षेप घेतला. या रस्त्यामुळे अतिपूर्वेकडील राज्यांमध्ये असणारी दळणवळण यंत्रणेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती भारताने व्यक्त केली. तर, चीनच्या दाव्यानुसार हा रस्ता चीन आपल्या अधिकारात असलेल्या भागात बांधत आहे. जर, सिक्कीम, भूतान व भारत या भौगोलिक तिठ्याजवळ चीनची दळणवळण व्यवस्था पोचली तर लष्करीदृष्ट्या चीन भारताच्या वरचढ ठरेल अशी भीती आहे. कारण या भागापासून चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा प्रांत जो अतिपूर्वेकडील राज्यांना उर्वरीत भारताशी जोडतो तो अत्यंत जवळ आहे. ही केवळ 27 किलोमीटर रुंदीची पट्टी असून ती जर युद्धाच्या फुफाट्यात सापडली तर अतिपूर्वेकडील राज्यांचा उर्वरीत भारताशी संपर्क पूर्णपणे बंद होईल.
या पार्श्वभूमीवर चीन व भारतातील सध्याची संघर्षमय स्थिती महत्त्वाची असून त्यात रोज प्रतिकूल घटनांची भर पडत आहे.