शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी

By admin | Updated: July 6, 2017 13:50 IST

जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. चिनी सरकारच्या मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये हिमालयामधील देशांना भारताने आपल्या मागे ओढू नये असा सूर उमटला आहे. संपादकीयामध्ये भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा देईल असे म्हटले आहे.
भारत सीमाभागामध्ये आगळिक करत असून त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागेल अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे. चीनमधील सरकारी मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेला सूर हा चिनी सरकारची अधिकृत भूमिका मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर सिक्कीम सीमेवर भारत चीनमध्ये असलेला वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सिक्कीममधील जनतेने याआधी 1960 व 1970 मध्ये स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने केली परंतु ती निर्दयीपणे चिरडण्यात आल्याचा हास्यास्पद दावाही चीनने केला आहे. भारताने 1975 मध्ये सिक्कीमच्या राजाला पदच्यूत केले आणि सिक्कीमला भारतात जोडले असा दाखला संपादकीयात देण्यात आला आहे.
भारत तिबेट व दलाई लामांचा विषय काढेल हे गृहीत धरून चिनी प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेकवेळा काढून झालेला आहे आणि आता त्यात नवीन भर टाकण्यासारखे काही नसल्याचा दावाही केला आहे. जर चीनने भारताशी असलेल्या संबंधांचा पुनर्विचार केला तर भारताला ते महागात जाईल अशी धमकी पुन्हा एकदा चीनने दिली आहे. 
काही दिवसांपूर्वी 1962 च्या युद्धाचा दाखला देत भारताने इतिहासापासून बोध घ्यावा अशी धमकी चीनने दिली होती.
 
आणखी वाचा
 
 
भारतामध्ये प्रवास करणाऱ्या चिनी प्रवाशांना ट्रॅव्हेल अॅलर्ट देण्याचा विचार करत असल्याचेही चीनने म्हटले आहे. 1890 मध्ये इंग्लंड व चीनमध्ये झालेल्या कराराचा भारत भंग करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. 
चीन सिक्कीम सीमेवरील डोंगलाँग या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता बांधत असून भारताने याला आक्षेप घेतला. या रस्त्यामुळे अतिपूर्वेकडील राज्यांमध्ये असणारी दळणवळण यंत्रणेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती भारताने व्यक्त केली. तर, चीनच्या दाव्यानुसार हा रस्ता चीन आपल्या अधिकारात असलेल्या भागात बांधत आहे. जर, सिक्कीम, भूतान व भारत या भौगोलिक तिठ्याजवळ चीनची दळणवळण व्यवस्था पोचली तर लष्करीदृष्ट्या चीन भारताच्या वरचढ ठरेल अशी भीती आहे. कारण या भागापासून चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा प्रांत जो अतिपूर्वेकडील राज्यांना उर्वरीत भारताशी जोडतो तो अत्यंत जवळ आहे. ही केवळ 27 किलोमीटर रुंदीची पट्टी असून ती जर युद्धाच्या फुफाट्यात सापडली तर अतिपूर्वेकडील राज्यांचा उर्वरीत भारताशी संपर्क पूर्णपणे बंद होईल.
या पार्श्वभूमीवर चीन व भारतातील सध्याची संघर्षमय स्थिती महत्त्वाची असून त्यात रोज प्रतिकूल घटनांची भर पडत आहे.