शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी

By admin | Updated: July 6, 2017 13:50 IST

जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. चिनी सरकारच्या मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये हिमालयामधील देशांना भारताने आपल्या मागे ओढू नये असा सूर उमटला आहे. संपादकीयामध्ये भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा देईल असे म्हटले आहे.
भारत सीमाभागामध्ये आगळिक करत असून त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागेल अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे. चीनमधील सरकारी मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेला सूर हा चिनी सरकारची अधिकृत भूमिका मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर सिक्कीम सीमेवर भारत चीनमध्ये असलेला वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सिक्कीममधील जनतेने याआधी 1960 व 1970 मध्ये स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने केली परंतु ती निर्दयीपणे चिरडण्यात आल्याचा हास्यास्पद दावाही चीनने केला आहे. भारताने 1975 मध्ये सिक्कीमच्या राजाला पदच्यूत केले आणि सिक्कीमला भारतात जोडले असा दाखला संपादकीयात देण्यात आला आहे.
भारत तिबेट व दलाई लामांचा विषय काढेल हे गृहीत धरून चिनी प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेकवेळा काढून झालेला आहे आणि आता त्यात नवीन भर टाकण्यासारखे काही नसल्याचा दावाही केला आहे. जर चीनने भारताशी असलेल्या संबंधांचा पुनर्विचार केला तर भारताला ते महागात जाईल अशी धमकी पुन्हा एकदा चीनने दिली आहे. 
काही दिवसांपूर्वी 1962 च्या युद्धाचा दाखला देत भारताने इतिहासापासून बोध घ्यावा अशी धमकी चीनने दिली होती.
 
आणखी वाचा
 
 
भारतामध्ये प्रवास करणाऱ्या चिनी प्रवाशांना ट्रॅव्हेल अॅलर्ट देण्याचा विचार करत असल्याचेही चीनने म्हटले आहे. 1890 मध्ये इंग्लंड व चीनमध्ये झालेल्या कराराचा भारत भंग करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. 
चीन सिक्कीम सीमेवरील डोंगलाँग या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता बांधत असून भारताने याला आक्षेप घेतला. या रस्त्यामुळे अतिपूर्वेकडील राज्यांमध्ये असणारी दळणवळण यंत्रणेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती भारताने व्यक्त केली. तर, चीनच्या दाव्यानुसार हा रस्ता चीन आपल्या अधिकारात असलेल्या भागात बांधत आहे. जर, सिक्कीम, भूतान व भारत या भौगोलिक तिठ्याजवळ चीनची दळणवळण व्यवस्था पोचली तर लष्करीदृष्ट्या चीन भारताच्या वरचढ ठरेल अशी भीती आहे. कारण या भागापासून चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा प्रांत जो अतिपूर्वेकडील राज्यांना उर्वरीत भारताशी जोडतो तो अत्यंत जवळ आहे. ही केवळ 27 किलोमीटर रुंदीची पट्टी असून ती जर युद्धाच्या फुफाट्यात सापडली तर अतिपूर्वेकडील राज्यांचा उर्वरीत भारताशी संपर्क पूर्णपणे बंद होईल.
या पार्श्वभूमीवर चीन व भारतातील सध्याची संघर्षमय स्थिती महत्त्वाची असून त्यात रोज प्रतिकूल घटनांची भर पडत आहे.