शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आॅक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन ११ रुग्ण दगावले

By admin | Updated: June 24, 2017 02:49 IST

आॅक्सिजन पुरवठा बंद होऊन एमवाय (महाराजा यशवंतराव) रुग्णालयात ११ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली

इंदौर : आॅक्सिजन पुरवठा बंद होऊन एमवाय (महाराजा यशवंतराव) रुग्णालयात ११ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली. आॅक्सिजन पुरवठा पहाटे १५ मिनिटे बंद झाल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. एमवायसारख्या मोठ्या रुग्णालयात एवढे रुग्ण दगावणे सामान्य बाब असल्याचे सांगून रुग्णालय प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आॅक्सिजनअभावीवा इतर प्रकारच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता विभागीय आयुक्त संजय दुबे यांनी फेटाळून लावली. तथापि, आवश्यकता भासल्यास या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. माध्यम प्रतिनिधींनी एकदम एवढे मृत्यू कशामुळे झाले, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मृतांचे सर्व रेकॉर्ड तसेच आॅक्सिजन पुरवठ्याच्या नोंदी असलेले लॉगबुक बेपत्ता असल्याचे आढळून आले. प्रत्येक ठिकाणचे रुग्णालय अधिकारी काहीही विपरीत घडले नसल्याचे म्हणत होते. मात्र, त्यांनी फाइल्स दाखवल्या नाहीत. रुग्णालयातील काही उच्चस्तरीय सूत्रांनी पहाटे तीन वाजता रुग्णालयातील आॅक्सिजन पुरव ठ्यात व्यत्यय आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. आॅक्सिजन पुरवठा विभागाच्या नोंदी आणि या विभागाचे कर्मचारी नदारद असल्यामुळे नेमके काय घडले, याची माहिती केवळ काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, हे अधिकारी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे गूढ वाढले आहे. एमवाय हॉस्पिटल एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असून, दुबे या महाविद्यालयाच्या स्वायत्त कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत. कुठेही निष्काळजीपणा झालेला नाही. काही स्थानिक दैनिकांनी चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यानंतर, मी रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डाला भेट दिली. आॅक्सिजनचा पुरवठा कुठेही खंडित झाला नव्हता. १४०० खाटांच्या रुग्णालयात एवढे मृत्यू ही सामान्य बाब आहे. येथे रोज १०-१२ मृत्यू होतात, असे ते म्हणाले.