शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पुरवणी लेख....-आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य ...........1

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.
अर्थात असं नव्हतं की, अकोले विधानसभा मतदारसंघात वादळवारं नव्हते, उलट मला पराभूत करण्यासाठी विविध पातळीवरुन प्रयत्न केले जात होते. कोठे शत प्रतिशत, कोठे अब की बार, कोठे धनुष्यबाण, कोठे गद्दारी, कोठे बाह्य हस्तक्षेप अशा पध्दतीने माझ्या विरोधात विरोधक रान उठवित होते. टोकाचा विरोध करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत होते. माझा विजय निश्चित सोपा नव्हता. विरोधकांना पिचड घराण्याचा कायमस्वरुपी पराभव सतत दिसतो तर पिचड घराण्यांवर प्रेम करणार्‍या अठरा पगड जातीच्या, आदिवासी जमातीच्या माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, युवकांना, जेष्ठ नागरिकांना पिचड यांचा जय-विजयच दिसतो आणि हेच गमक आहे माजी मंत्री पिचड साहेबांच्या विचारात व कार्यप्रणालीत.
समाज जीवनात आदरणीय साहेबांचा सक्रियतेचा काळ जवळपास अर्धशतकाचा असेल. पंचायत समितीचे सभापती, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इत्यादी वेळोवेळी मिळालेल्या पदांचा वापर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी, आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कासाठी, तालुक्यातील जनतेसाठी, तालुक्याच्या पाणी प्रश्नांसाठी शिक्षणासाठी, रस्ते व दळणवळण सुविधांसाठी, निळवंडे, आंबीत, पिंपळगाव खांड, सांगवी, बलठण, शिरपुंजे, कोथळे, पाडोशी आदि धरण शृंखलेच्या निर्मितीसाठी, प्रकल्पग्रस्तांच्या आदर्श पुनर्वसनासाठी, दुग्ध पंढरीसाठी, तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती कारखान्यासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्यासाठी, राष्ट्रीय पातळीवर आदिवासीचे संघटन व्हावे यासाठी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी, पाणीप्रश्नावरील तसेच शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी व उन्नतीसाठी, आदिवासी समाजात झालेल्या बोगस आदिवासींच्या घुसखोरींच्या विरोधासाठी, तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी, वीज प्रकल्पांची निर्मिती व तालुक्यात वीजवितरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी अशा विविध कामांसाठी त्यांनी केला.