शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी लेख....-आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य ...........1

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.
अर्थात असं नव्हतं की, अकोले विधानसभा मतदारसंघात वादळवारं नव्हते, उलट मला पराभूत करण्यासाठी विविध पातळीवरुन प्रयत्न केले जात होते. कोठे शत प्रतिशत, कोठे अब की बार, कोठे धनुष्यबाण, कोठे गद्दारी, कोठे बाह्य हस्तक्षेप अशा पध्दतीने माझ्या विरोधात विरोधक रान उठवित होते. टोकाचा विरोध करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत होते. माझा विजय निश्चित सोपा नव्हता. विरोधकांना पिचड घराण्याचा कायमस्वरुपी पराभव सतत दिसतो तर पिचड घराण्यांवर प्रेम करणार्‍या अठरा पगड जातीच्या, आदिवासी जमातीच्या माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, युवकांना, जेष्ठ नागरिकांना पिचड यांचा जय-विजयच दिसतो आणि हेच गमक आहे माजी मंत्री पिचड साहेबांच्या विचारात व कार्यप्रणालीत.
समाज जीवनात आदरणीय साहेबांचा सक्रियतेचा काळ जवळपास अर्धशतकाचा असेल. पंचायत समितीचे सभापती, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इत्यादी वेळोवेळी मिळालेल्या पदांचा वापर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी, आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कासाठी, तालुक्यातील जनतेसाठी, तालुक्याच्या पाणी प्रश्नांसाठी शिक्षणासाठी, रस्ते व दळणवळण सुविधांसाठी, निळवंडे, आंबीत, पिंपळगाव खांड, सांगवी, बलठण, शिरपुंजे, कोथळे, पाडोशी आदि धरण शृंखलेच्या निर्मितीसाठी, प्रकल्पग्रस्तांच्या आदर्श पुनर्वसनासाठी, दुग्ध पंढरीसाठी, तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती कारखान्यासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्यासाठी, राष्ट्रीय पातळीवर आदिवासीचे संघटन व्हावे यासाठी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी, पाणीप्रश्नावरील तसेच शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी व उन्नतीसाठी, आदिवासी समाजात झालेल्या बोगस आदिवासींच्या घुसखोरींच्या विरोधासाठी, तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी, वीज प्रकल्पांची निर्मिती व तालुक्यात वीजवितरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी अशा विविध कामांसाठी त्यांनी केला.