शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

तेलंगणात सूर्य कोपला; उष्माघाताचे २१९ बळी

By admin | Updated: May 4, 2016 02:07 IST

संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा

हैदराबाद : संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा उष्माघाताने बळी घेतला आहे.सरकारच्या आपत्ती निवारण विभागानेच ही माहिती दिली असून, आदिलाबाद, निजामाबाद, खम्माम आणि करीमनगर या जिल्ह्यांत आणखी काही काळ उन्हाच्या तीव्र झळा चालूच राहतील, असे हवामान खात्याने नमूद केले आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात, तसेच कर्नाटकातील टुमकूर आणि हसन जिल्ह्यांतही पारा ४४ च्या आसपास राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. आंध्र प्रदेशात उष्माघाताने सुमारे ५९ जणांचा बळी घेतला आहे. राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्येही तापमान ४४ च्या वर गेले असून, काही ठिकाणी ते ४६ च्या आसपास आहे. जेसलमेरमध्ये तर तापमान ५0 अंशांच्या आसपास पोहोचले असल्याने, सकाळी ९ वाजल्यानंतर लोक शक्यतो बाहेर पडण्याचेही टाळत आहेत. ओडिशातील बहुसंख्य शहरे व जिल्ह्यांतही तापमान ४४ च्या आसपास आहे. आतापर्यंत ओडिशामध्ये उष्माघाताने १३५ जण मरण पावले. कडक उन्हाळ्यामुळे बिहारमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या काळात यज्ञ, होमहवन करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे.