सारांश
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
अ.भा. माळी महासंघाच्या प्रयत्नांना यश
सारांश
अ.भा. माळी महासंघाच्या प्रयत्नांना यशनागपूर : महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न देण्यासाठी अ.भा. माळी महासंघाने मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला असून, केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अ.भा. माळी महासंघ, महात्मा फुले शिक्षण संस्था, विदर्भ माळी कल्याणकारी मंडळ, संत सावता बहुउद्देशीय संस्था आदी संघटनांनी मुख्यमंत्र्यांप्रति आभार व्यक्त केले आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारानागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. आजपर्यंत रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास कार्यालयाने अनेकवेळा कागदपत्रे मागितली परंतु निर्णय झाला नाही. त्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष रणजित सोमकुवर, सचिव संजय लिखितकर, राजकुमार फुलझेले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओंकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारनागपूर : ओंकारनगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ओंकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुनील अडगावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे संजय चिडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साकेत धार्मिक, धवन रेंगे, आदिती जुमळे, आयुषी जुमळे, श्रेया बोबडे, अभिषेक अंधारे, तुषार तायवाडे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या ऑटो स्टॅण्डचे उद्घाटननागपूर : महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख आशिष मनपिया यांच्या नेतृत्वात संघर्षनगर येथे महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेतर्फे ऑटो स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सतीश बोकडे, मनीषा कार्लेकर, दिलीप पाल, अलका दलाल, गौरव गुप्ता, रंजना देशमुख, रजत देशमुख, श्वेता मेश्राम, पायल भनारकर, स्वप्नील मुळे, मंगेश खडके, किशोर विरुळकर, विनय गुप्ता, श्याम चौधरी, विशाल सावते, कल्ला नायक, वसीम खान आदी उपस्थित होते. वाढीव वेतनासाठी एस.टी. अप्रेन्टिस संपावरनागपूर : सरकारच्या शासकीय अध्यादेशाप्रमाने राज्यातील शासकीय व निमशासकीय उद्योगामध्ये शिकावू कामगारांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विद्यावेतनात वाढ केली नाही. त्यामुळे शिकावू कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय अध्यादेशाप्रमाणे वेतनवाढ लवकरात लवकर देण्यात यावी, या मागणीसाठी शिकावू कामगार तीन दिवसांच्या संपावर आहेत.