शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सुकमा हल्ल्यातील जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही - राजनाथ सिंह

By admin | Updated: April 25, 2017 13:05 IST

छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 25 - छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जवानांवर झालेला हल्ला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचं म्हणत जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही असा विश्वास त्यांनी दिला आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करताना राजनाथ सिंग संतप्त दिसत होते. नक्षलवाद्यांच्या समस्येला आपण एक आव्हान म्हणून स्विकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
(नक्षलवाद्यांना भिडला सीआरपीएफचा "शेर", आई म्हणते मला गर्व)
 
जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या राजनाथ सिंह यांनी यावेळी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांनी आदिवासी लोकांना आपली ढाल बनवून हल्ला केल्याचं त्यांना यावेळी सांगितलं. " आतापर्यंत नक्षलवाद्यांवर जी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे ते घाबरले आहे. यामुळे त्यांनी हा हल्ला केला आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यासंबंधी धोरणावर पुन्हा विचार केला जाईल. 8 मे रोजी दिल्लीत यासंबंधी बैठक होईल. या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी सामील होतील", अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. 
 
आदिवासी विभागात विकास होऊ नये यासाठी नक्षलवादी विकासात अडथळा आणण्याच्या दृष्टीने हे हल्ले करत असल्याचंही राजनाथ सिंह बोलले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी पायाभूत सुविधांशी संबंधित कामं सुरु राहतील असं सांगितलं आहेत. "विकासाशी संबंधित कामं सुरु आहेत. यामुळे नक्षलवाद्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. म्हणून रस्ते बांधकामाच्या कामात ते अडथळे आणत असून शाळा बांधून देत नाही आहेत. चांगलं धोरण आखत त्यांचा सामना केला जाईल", असं ते बोलले आहेत.
 
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.
 
सोमवारीस सकाळी या पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी १२ वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती, असे राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.