शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

सुकमा हल्ल्यातील जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही - राजनाथ सिंह

By admin | Updated: April 25, 2017 13:05 IST

छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 25 - छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जवानांवर झालेला हल्ला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचं म्हणत जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही असा विश्वास त्यांनी दिला आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करताना राजनाथ सिंग संतप्त दिसत होते. नक्षलवाद्यांच्या समस्येला आपण एक आव्हान म्हणून स्विकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
(नक्षलवाद्यांना भिडला सीआरपीएफचा "शेर", आई म्हणते मला गर्व)
 
जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या राजनाथ सिंह यांनी यावेळी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांनी आदिवासी लोकांना आपली ढाल बनवून हल्ला केल्याचं त्यांना यावेळी सांगितलं. " आतापर्यंत नक्षलवाद्यांवर जी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे ते घाबरले आहे. यामुळे त्यांनी हा हल्ला केला आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यासंबंधी धोरणावर पुन्हा विचार केला जाईल. 8 मे रोजी दिल्लीत यासंबंधी बैठक होईल. या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी सामील होतील", अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. 
 
आदिवासी विभागात विकास होऊ नये यासाठी नक्षलवादी विकासात अडथळा आणण्याच्या दृष्टीने हे हल्ले करत असल्याचंही राजनाथ सिंह बोलले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी पायाभूत सुविधांशी संबंधित कामं सुरु राहतील असं सांगितलं आहेत. "विकासाशी संबंधित कामं सुरु आहेत. यामुळे नक्षलवाद्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. म्हणून रस्ते बांधकामाच्या कामात ते अडथळे आणत असून शाळा बांधून देत नाही आहेत. चांगलं धोरण आखत त्यांचा सामना केला जाईल", असं ते बोलले आहेत.
 
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.
 
सोमवारीस सकाळी या पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी १२ वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती, असे राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.