शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

संधिसाधूंचा सुकाळ....... ( कारण... राजकारण... शहर विशेष... स.सो.खंडाळकर)

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.
सध्या भाजपमध्ये जाण्याची टूम दिसते. भाजपमध्ये जाणार्‍यांना उद्या हाफ चड्डीतही दिसावं लागेल, याचं भान नाही. भान कशाला हवं? तेही करण्याची तयारी राहील. हाफ काय आणि पूर्ण चड्डी काय? आचार आणि विचार याची जीवनात सुसंगती नसते, तेव्हा कुणी कसाही भरकटतो आणि स्वार्थ साधतो, हेच यातलं अंतिम सत्य. कालचे काँग्रेसवाले आज भाजपवाले होतात, याला काय म्हणायचं? विचाराच्या पातळीवर मग काय फरक राहिला? भाजपसुद्धा काँग्रेस व्हायच्या मार्गावर आहे, हेच खरं!
ज्या भाजपला पूर्वी सर्रासपणे जातीय पक्ष म्हणून नावं ठेवली जायची, तोच भाजप आज या संधिसाधूंना कमालीचा गोड वाटत आहे. कारण तो देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत आहे; पण त्यांनाही कुणीतरी केजरीवाल मध्येच भेटतो आणि तो पानिपत करीत असतो, हेही लक्षात ठेवण्यासारखी आजची परिस्थिती आहे. मोदीची लाट आहे असं म्हणत ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात काही नगरसेवक त्याच वेळी भाजपवासी झाले. आता पुन्हा आणखी सहा नगरसेवक भाजपवासी झाले. जुनं लग्न मोडून आज लगेच भाजपचं कुंकू लावायला तयार! म्हणजे त्या लग्नाला काही अर्थच नाही. असं सगळं आचारहीन व विचारहीन होत असताना भाजपलाही वाटायला लागलंय की आता आपली ताकद खूप वाढायला लागली. आपण मोठे भाऊ व्हायला लागलोत; पण गद्दार ते गद्दारच असतात. आज इकडे तर उद्या तिकडे. फक्त स्वार्थ साधला गेला पाहिजे. अन्यथा ते कुणाच्याही तोंडावर थुंकायला तयार! आज भाजपमध्ये चाललेल्यांना उद्या पुन्हा काँग्रेस सत्तेत यायला लागली अशी चाहूल लागायला उशीर... टुणकन पुन्हा काँग्रेसमध्ये उडी!