शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
2
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
3
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
4
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
5
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
6
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
7
अग्रलेख: आयोगावर आक्षेपांचे ढग! विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह तर येणारच
8
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
9
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
10
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
11
विशेष लेख: बहुराष्ट्रवादाची हार आणि जागतिक संस्थांची थडगी
12
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
13
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
14
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
15
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
16
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
17
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
18
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
19
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
20
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

संधिसाधूंचा सुकाळ....... ( कारण... राजकारण... शहर विशेष... स.सो.खंडाळकर)

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.
सध्या भाजपमध्ये जाण्याची टूम दिसते. भाजपमध्ये जाणार्‍यांना उद्या हाफ चड्डीतही दिसावं लागेल, याचं भान नाही. भान कशाला हवं? तेही करण्याची तयारी राहील. हाफ काय आणि पूर्ण चड्डी काय? आचार आणि विचार याची जीवनात सुसंगती नसते, तेव्हा कुणी कसाही भरकटतो आणि स्वार्थ साधतो, हेच यातलं अंतिम सत्य. कालचे काँग्रेसवाले आज भाजपवाले होतात, याला काय म्हणायचं? विचाराच्या पातळीवर मग काय फरक राहिला? भाजपसुद्धा काँग्रेस व्हायच्या मार्गावर आहे, हेच खरं!
ज्या भाजपला पूर्वी सर्रासपणे जातीय पक्ष म्हणून नावं ठेवली जायची, तोच भाजप आज या संधिसाधूंना कमालीचा गोड वाटत आहे. कारण तो देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत आहे; पण त्यांनाही कुणीतरी केजरीवाल मध्येच भेटतो आणि तो पानिपत करीत असतो, हेही लक्षात ठेवण्यासारखी आजची परिस्थिती आहे. मोदीची लाट आहे असं म्हणत ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात काही नगरसेवक त्याच वेळी भाजपवासी झाले. आता पुन्हा आणखी सहा नगरसेवक भाजपवासी झाले. जुनं लग्न मोडून आज लगेच भाजपचं कुंकू लावायला तयार! म्हणजे त्या लग्नाला काही अर्थच नाही. असं सगळं आचारहीन व विचारहीन होत असताना भाजपलाही वाटायला लागलंय की आता आपली ताकद खूप वाढायला लागली. आपण मोठे भाऊ व्हायला लागलोत; पण गद्दार ते गद्दारच असतात. आज इकडे तर उद्या तिकडे. फक्त स्वार्थ साधला गेला पाहिजे. अन्यथा ते कुणाच्याही तोंडावर थुंकायला तयार! आज भाजपमध्ये चाललेल्यांना उद्या पुन्हा काँग्रेस सत्तेत यायला लागली अशी चाहूल लागायला उशीर... टुणकन पुन्हा काँग्रेसमध्ये उडी!