शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

संधिसाधूंचा सुकाळ....... ( कारण... राजकारण... शहर विशेष... स.सो.खंडाळकर)

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.
सध्या भाजपमध्ये जाण्याची टूम दिसते. भाजपमध्ये जाणार्‍यांना उद्या हाफ चड्डीतही दिसावं लागेल, याचं भान नाही. भान कशाला हवं? तेही करण्याची तयारी राहील. हाफ काय आणि पूर्ण चड्डी काय? आचार आणि विचार याची जीवनात सुसंगती नसते, तेव्हा कुणी कसाही भरकटतो आणि स्वार्थ साधतो, हेच यातलं अंतिम सत्य. कालचे काँग्रेसवाले आज भाजपवाले होतात, याला काय म्हणायचं? विचाराच्या पातळीवर मग काय फरक राहिला? भाजपसुद्धा काँग्रेस व्हायच्या मार्गावर आहे, हेच खरं!
ज्या भाजपला पूर्वी सर्रासपणे जातीय पक्ष म्हणून नावं ठेवली जायची, तोच भाजप आज या संधिसाधूंना कमालीचा गोड वाटत आहे. कारण तो देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत आहे; पण त्यांनाही कुणीतरी केजरीवाल मध्येच भेटतो आणि तो पानिपत करीत असतो, हेही लक्षात ठेवण्यासारखी आजची परिस्थिती आहे. मोदीची लाट आहे असं म्हणत ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात काही नगरसेवक त्याच वेळी भाजपवासी झाले. आता पुन्हा आणखी सहा नगरसेवक भाजपवासी झाले. जुनं लग्न मोडून आज लगेच भाजपचं कुंकू लावायला तयार! म्हणजे त्या लग्नाला काही अर्थच नाही. असं सगळं आचारहीन व विचारहीन होत असताना भाजपलाही वाटायला लागलंय की आता आपली ताकद खूप वाढायला लागली. आपण मोठे भाऊ व्हायला लागलोत; पण गद्दार ते गद्दारच असतात. आज इकडे तर उद्या तिकडे. फक्त स्वार्थ साधला गेला पाहिजे. अन्यथा ते कुणाच्याही तोंडावर थुंकायला तयार! आज भाजपमध्ये चाललेल्यांना उद्या पुन्हा काँग्रेस सत्तेत यायला लागली अशी चाहूल लागायला उशीर... टुणकन पुन्हा काँग्रेसमध्ये उडी!