शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आत्महत्या करणारा शेतकरी भित्राच - हरियाणाच्या कृषीमंत्र्यांची मुक्ताफळे

By admin | Updated: April 29, 2015 11:31 IST

देशभरात शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु असतानाच हरियाणाच्या कृषीमंत्र्यांनी शेतक-यांनाच भित्रा ठरवत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग केले आहेत.

ऑनलाइन लोकमत

चंदिगड, दि. २९ -  अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असतानाच हरियाणातील भाजपा सरकारमधील कृषी मंत्र्यांनी शेतक-यांना भित्रा ठरवत शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग केले आहे. आत्महत्या करणारे शेतकरी भित्रे असून सरकार अशा शेतक-यांसोबत नाही असे संतापजनक विधान कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड यांनी केले आहे. 

शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटनेने देशभरातून चिंता व्यक्त होत असतानाच या गंभीर विषयावर हरियाणाचे कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड यांनी ज्ञान पाजळले. धनकड म्हणाले, आत्महत्या करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून असा गुन्हा करणा-या शेतक-यांना सरकार पाठिंबा देणार नाही. कोणत्याही परिस्थीतीत आत्महत्येला प्रोत्साहन द्यायला नको असेही त्यांनी स्पष्ट केले. धनकड यांच्या विधानावर आता सर्वच स्तरातून तिखट प्रतिक्रिया येत आहे. शेतकरी पिकाचे नुकसान व कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त झाला आहे व धनकड त्यांना भित्रा ठरवत आहेत हा प्रकार निंदनीय आहे असे काँग्रेसचे स्थानिक नेते अशोक तंवर यांनी सांगितले. तर धनकड यांनी शेतक-यांचा अपमान केला असे अजय माकन यांनी म्हटले आहे.