शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ऊस पिकासाठी ठिबक सिंचन न केल्यास साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही

By admin | Updated: May 22, 2015 00:24 IST

साखर आयुक्ताचे राज्यातील साखर कारखान्यांना इशारा

साखर आयुक्ताचे राज्यातील साखर कारखान्यांना इशारा
पुणे: ठिबक सिंचन तंत्रज्ञान आधुनिक ऊस शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून, पाण्याची पन्नास टक्के बचते होते. ठिबक सिंचन योजनेसाठी शासनाकडून शेतक-यांना दर वर्षी लाखो रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. परंतु अद्यापही राज्यात ठिबक सिंचनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्याबाबत कार्यवाई न केल्यास यापुढे साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येणार नसल्याचा इशारा साखर आयुक्त यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र देशात ऊस व साखर उत्पादनात अग्रेसर असले तरी गेल्या काही वर्षांत सातत्याने पडणारा दुष्काळ, पावसाची अनियमिता व अयोग्य सिंचन पध्दत यामुळे ऊस क्षेत्र व ऊस उत्पादनामध्ये शाश्वतता दिसत नाही. त्यात कारखान्यांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे कारखान्यांना पुरेसा ऊस गाळपाकरीता उपलब्ध होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रति हेक्टर ऊस उत्पादकता आणि उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करणे काळाची गरज आहे. साखर कारखान्यांना कार्यक्षमतेने चालण्याकरीता जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होण्यासाठी ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये ठिबक सिंचन एक महत्वाचे तंत्र असून, यामुळे उत्पादकता वाढते, पाण्याचा कार्यक्षमतेने वापर, वीजेची व मजुरांची बचत, जमीन क्षारपड न होणे असे अनेक फायदे मिळतात.
ठिबक सिंचनामुळे ऊस उत्पादनात प्रति हेक्टर १४८ ते २२७ टनापर्यंत वाढ होते. तसेच पाण्याची बचत होऊन रासायनिक खतांत ३० ते ५० टक्क्यापर्यंत बचत होते. तसेच आर्थिकदृष्या हे तंत्रज्ञान परवडणारे आहे. त्यामुळे ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी सर्व साखर कारखान्यांनी शेतक-यांना यांचे महत्व पटवून द्यावे, ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांना अनुदान व कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक हमी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.