शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुढील हंगामात साखर कारखाने बंद ठेवणार

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

एफआरपी देणे अशक्य : खासगी कारखानदारांच्या संघटनेचा इशारा

एफआरपी देणे अशक्य : खासगी कारखानदारांच्या संघटनेचा इशारा
सोलापूर: बाजारातील साखरेचे घसरलेले दर सावरत नसल्याने एफआरपीप्रमाणे दर देणे अशक्य आहे. केंद्र व राज्य शासन आडमुठे धोरण स्वीकारत असल्याने पुढील हंगामात कारखाने एकजुटीने बंद ठेवण्यात येतील, असा इशारा खासगी साखर कारखानदार संघटनेच्या वतीने (विस्मा) पत्रकार परिषदेत देण्यात आला.
राज्यातील साखर कारखानदारी सध्या मोठ्या अडचणीत आहे. यामुळे राज्यातील ८७ खासगी साखर कारखानदारांची बैठक पुणे येथे ५ जुलै रोजी झाली. यामध्ये चर्चेअंती निर्णय घेण्यात आला. साखरेचे दर १९०० रुपयांवर आले असताना एफआरपी देणे एकाही कारखान्याला शक्य नसल्याचे विस्मा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
-----------
- मागील ५ वर्षांत उत्पादन वाढीमुळे अतिरिक्त साखरेचे भाव ४० टक्क्यांनी कमी झाले तर एफआरपीचे दर केंद्राने ७० टक्क्यांनी वाढविले़
- २०१४-१५ च्या हंगामासाठीची ऊस देयके शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणे देणे अशक्य आहे
- ऑक्टोबर १४ ते आजअखेर साखरेचा दर ८०० रुपयांनी घसरला
- कृषीमूल्य आयोगाच्या व सी.रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार एफआरपीनुसार रक्कम केंद्र व राज्य शासनाने थेट शेतकर्‍यांना द्यावी
- शासनाने कायदेशीर कारवाई केल्यास सर्व कारखानदार एकजुटीने सामोरे जातील
- वाढत्या उत्पादनाचा विचार करुन २० टक्के साखर निर्यात करावी व त्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवावे
--------
१५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात
२०१५-१६ च्या हंगामात एफ.आर.पी. व रंगराजन समितीच्या सूत्रानुसार एकूण उत्पन्नाच्या ७० ते ७५ टक्के ऊस यातील फरक केंद्राने कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखर किंमत स्थिरीकरण निधीतून थेट शेतकर्‍यांना द्यावी तसे लेखी आदेश काढले तरच हंगाम सुरू करणार असल्याचे विस्मा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे.