शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे २५२५ कोटी थकवले

By admin | Updated: February 25, 2015 01:55 IST

ऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़खासदार राजू शेट्टी आणि कोथापल्ली गीता यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल खुद्द ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच ही माहिती दिली आहे़ शेतकऱ्यांना वेळेत उचल देण्याच्या नावावर देशभरातील साखर कारखान्यांनी ६,६५५़१० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे़ मात्र असे असूनही २०१३-१४ च्या गळीत हंगामात खरेदी केलेल्या उसाची २५२५़८७ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही़ विशेष म्हणजे स्वस्त व्याज दरावर कर्ज घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे़ ऊस उत्पादकांना उचल देण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना २०७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज मंजूर केले गेले आहे़ यापैकी २०४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे प्रत्यक्ष वाटपही झाले आहे़ महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यांनाही सर्वाधिक १९५५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे़ यापैकी १८६४ कोटींच्या कर्जाचे वाटप झाले आहे़दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०१४ पासून साखर कारखान्यांना स्वस्त व्याजदराने कर्जाचे वाटप सुरू आहे़ यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाला नोडल बँक बनविण्यात आले आहे़ या कर्जाचा वापर शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी देण्याशिवाय अन्य दुसऱ्या कामासाठी करता येणार नाही, अशी मुख्य अट आहे़ मात्र असे असूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा परतावा मिळालेला नाही़ ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ अंतर्गत ऊस उत्पादकांना त्यांच्या मालाची किंमत वेळेत चुकती केली जावी, अशी तरतूद आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकारची जबाबदारी आहे़