शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे २५२५ कोटी थकवले

By admin | Updated: February 25, 2015 01:55 IST

ऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़खासदार राजू शेट्टी आणि कोथापल्ली गीता यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल खुद्द ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच ही माहिती दिली आहे़ शेतकऱ्यांना वेळेत उचल देण्याच्या नावावर देशभरातील साखर कारखान्यांनी ६,६५५़१० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे़ मात्र असे असूनही २०१३-१४ च्या गळीत हंगामात खरेदी केलेल्या उसाची २५२५़८७ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही़ विशेष म्हणजे स्वस्त व्याज दरावर कर्ज घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे़ ऊस उत्पादकांना उचल देण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना २०७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज मंजूर केले गेले आहे़ यापैकी २०४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे प्रत्यक्ष वाटपही झाले आहे़ महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यांनाही सर्वाधिक १९५५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे़ यापैकी १८६४ कोटींच्या कर्जाचे वाटप झाले आहे़दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०१४ पासून साखर कारखान्यांना स्वस्त व्याजदराने कर्जाचे वाटप सुरू आहे़ यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाला नोडल बँक बनविण्यात आले आहे़ या कर्जाचा वापर शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी देण्याशिवाय अन्य दुसऱ्या कामासाठी करता येणार नाही, अशी मुख्य अट आहे़ मात्र असे असूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा परतावा मिळालेला नाही़ ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ अंतर्गत ऊस उत्पादकांना त्यांच्या मालाची किंमत वेळेत चुकती केली जावी, अशी तरतूद आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकारची जबाबदारी आहे़