शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एलसीबीच्या तेरा कर्मचार्‍यांच्या अचानक बदल्या पोलीस दलात खळबळ : निनावी तक्रारीवरुन बदल्या झाल्याची चर्चा

By admin | Updated: December 3, 2015 00:35 IST

जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या तेरा कर्मचार्‍यांच्या अचानक मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करताना या कर्मचार्‍यांना कोणतेच कारण देण्यात आलेले नाही अथवा त्यांचे म्हणणेही घेण्यात आले नाही. पोलीस दलात दबदबा असलेल्या या कर्मचार्‍यांच्या अचानक झालेल्या बदल्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांनीही बदलीचे कारण सांगण्यास नकार दिला.

जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या तेरा कर्मचार्‍यांच्या अचानक मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करताना या कर्मचार्‍यांना कोणतेच कारण देण्यात आलेले नाही अथवा त्यांचे म्हणणेही घेण्यात आले नाही. पोलीस दलात दबदबा असलेल्या या कर्मचार्‍यांच्या अचानक झालेल्या बदल्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांनीही बदलीचे कारण सांगण्यास नकार दिला.
असे आहेत बदली झालेले कर्मचारी
सहायक फौजदार गोपाळ बळीराम चौधरी, हेडकॉन्स्टेबल भास्कर विठ्ठल पाटील, बापु फकीरा भोसले, रवींद्र मानसिंग गिरासे, चंद्रकांत सीताराम शिंदे, श्रीकृष्ण पटवर्धन, दीपक नाना शिरसाठ, सुधाकर रामदास अंभोरे, राजेंद्र राघो पाटील, दिनेशसिंग लोटू पाटील,नरेंद्र लोटन वारुळे, उषा बळीराम सोनवणे, संजय मुरलीधर पाटील आदींचा समावेश आहे. हे कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंध, सायबर सेल,अंगुली मुद्रा, अनैतिक मानवी वाहतुक व महिला सहाय कक्ष आदी विभागात कार्यरत होते.
कामाचा लेखाजोखा तपासला
स्थानिक गुन्हे शाखेच्या २० कर्मचार्‍यांबाबतीत विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंग यांच्याकडे निनावी तक्रार झाली होती. या तक्रारीवरून जयजीतसिंग यांनी काही दिवसापूर्वी या कर्मचार्‍यांचे शीट (कामाचा लेखाजोखा अहवाल) मागविले होते. त्यात बहुतांश कर्मचार्‍यांची कामगिरी चांगली आहे. तीन जणांचा तर राष्ट्रपती पुरस्कारासाठी प्रस्ताव आहे. एखाद्या व्यक्तीची निनावी तक्रार झाली तर त्याची नोंद घ्यावी, मात्र त्यावर विश्वास ठेवून कार्यवाही करून नये असे महासंचालकांचे पत्र असतानाही निनावी तक्रारीवरून या कर्मचार्‍यांची अचानक बदली करण्यात आली आहे.
अधिकार्‍यांना वेगळा न्याय
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. ते या गुन्‘ात संशयित आरोपी आहेत. त्यांनी बदलीचा अर्जही दिला आहे असे असताना त्यांची बदली होऊ शकत नाही व ज्यांच्याबाबतीत कोणाचीच तक्रार नाही अशा कर्मचार्‍यांच्या बदल्या होतात या वरिष्ठांच्या दुटप्पी भूमिकेमुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली आहे.
तत्काळ केले कार्यमुक्त
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पत्रानुसार पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी बुधवारी सकाळी या तेरा कर्मचार्‍यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी दीपक लगड यांनी त्यांना तत्काळ कार्यमुक्त केले. या सर्वांची मुख्यालयी बदली करण्यात आली आहे.