शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

सुब्बाराव यांनी केले ‘नोटाबंदी’चे स्वागत

By admin | Updated: November 17, 2016 02:22 IST

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सिंगापूर : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय गुंतवणुकीसाठी सकारात्मक सिद्ध होईल. तसेच त्यामुळे महागाईही कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.मिंटएशियाच्या जागतिक पातळीवरील बँकिंग कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सुब्बाराव म्हणाले की, या निर्णयाचे अनेक चांगले परिणाम होतील. लोकांना रोखीच्या व्यवहारापासून परावृत्त करून इलेक्ट्रॉनिक व्यवहाराकडे वळविण्यासाठी हा निर्णय लाभदायक ठरेल. रोखीच्या अर्थव्यवस्थेकडून कमी रोखीच्या अर्थव्यवस्थेकडे जाण्यास मदत होईल. सुब्बाराव म्हणाले की, या निर्णयाचा परिणाम टिकवून ठेवण्यासाठी काही कठोर उपाययोजना कराव्या लागतील. विशेषत: चलन व्यवस्थापनाबाबत नियम कठोर करावे लागतील. तसेच काळा पैसा पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. अनेक अनिवासी भारतीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उपकंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश खरा म्हणाले की, या निर्णयाची अंमलबजावणी हे आमच्यासाठी एक आव्हानही आहे. या निर्णयामुळे एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच खरेदीसाठी कार्डांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोखीचा प्रवाह वाढावा यासाठी एसबीआयकडून डेबिट कार्ड स्वाईप मशीनच्या व्हॅन पाठविण्यात येत आहे. बँकांकडे पैशाचा ओघ वाढल्यामुळे येणाऱ्या काळात कर्जाचे व्याजदर कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)