शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मुख्यमंत्र्यांकडूनच सुरू आहे स्टंटबाजी

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

विद्या बाळ : बलराज साहनी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण

विद्या बाळ : बलराज साहनी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण
पुणे : सध्या मंदिरप्रवेशावरुन चालू असलेल्या वादावर अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत. यामध्ये तृप्ती देसाई, गुप्ते यांसारख्या महिला स्टंटबाजी करत असल्याचे बोलले जात असताना कोणतीही ठोस भूमिका न घेतलेले मुख्यमंत्री खरी स्टंटबाजी करत आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केला.
बलराज सहानी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अभिनेता ओंकार गोवर्धन याला बलराज सहानी पुरस्काराने तर लेखक संजय पवार यांना कैफी आझमी पुरस्काराने बाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर फाऊंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर, दिग्दर्शक धम्मर्कीर्ती सुमंत, अलका देशपांडे व अनिकेत बाळ उपस्थित होते.
बाळ म्हणाल्या, 'महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत शासन आणि मुख्यमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत ही खेदाची बाब आहे. तर या अधिकारासाठी लढणार्‍या महिलांना अशाप्रकारे मार खावा लागतो ही वाईट गोष्ट आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाचा कायदा ५६ सालीच झालेला असून त्यासाठी भांडण्याची आवश्यकता नसून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.' बाईच्या पाळीचा शास्त्रीय आधार अपवित्र मानला जात असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही. सध्या प्रत्येकाच्या तोंडाला कुलूपे लावली जात असून दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि कन्हैया ही त्याची उदाहरणे आहेत. फुले, शाहू आणि आंबेडकरांची नावे घेऊन मोठमोठ्या बाता केल्या जातात, मात्र कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अवलंब होताना दिसत नाही.
नक्की राष्ट्रद्रोही कोण ?
रविवारी कन्हैया कुमारचे पुण्यात भाषण होते. त्याविषयी बोलताना बाळ म्हणाल्या, कन्हैयावरील राष्ट्रद्रोहाचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. तरीही त्याला काही जणांकडून राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. त्यामुळे तो राष्ट्रद्रोही आहे की त्याला राष्ट्रद्रोही ठरविणारे खरे राष्ट्रद्रोही आहेत याचा विचार व्हायला हवा.