शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 15, 2016 05:15 IST

इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात अनेक कारवाया करणार असल्याची भीती अनेकदा व्यक्त होत आली आहे. मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात अनेक कारवाया करणार असल्याची भीती अनेकदा व्यक्त होत आली आहे. मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजधानी दिल्लीतील जेएनयू व कन्हैया कुमार दरम्यान झालेल्या वादाच्या निमित्ताने आपल्या कारवाया सुरू करा, असा आदेश आपल्याला देण्यात आला होता, असे भारतातील इसिसमध्ये तरुणांना भरती करणाऱ्या म्होरक्यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. जुनुद अल खलीफा-ए-हिंद (जेकेएच) या भारतातील इसिसच्या शाखेतील आशिक अहमद उर्फ राजा, मोहम्मद अब्दुल अहद आणि मोहम्मद अफजल या तिघांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबातून ही बाब उघडकीस आली आहे.जेएनयूमधील वादग्रस्त कार्यक्रमानंतर कन्हैयाकुमार देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात असताना, त्याच्या सुटकेसाठी अनेक विद्यापीठातील हजारो विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याचवेळी इसिसच्या अहमद अलीने पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय आशिक अहमद उर्फ राजाला या आंदोलनात सहभागी होऊन वाहनांची जाळपोळ तसेच तोडफोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.एनआयएने इसिसशी संबंधित व्यक्तीचे जबाब भारतीय दंडविधानाच्या कलम १६४ अंतर्गत नोंदवून घेतले आहेत. या तिघांनी आपल्या जबानीत बंगळुरू, पश्चिम बंगाल व पंजाबमधील बैठकीत उपस्थित होतो, असे कबूल केले आहे. आशिकने दिलेल्या जबाबानुसार, अहमद अली हा स्वत:ची अन्सर-उत तौहीद फि बिलाद अल-हिंद अशी ओळख सांगत असे. त्याने १९ फेब्रुवारी रोजी ट्रिलियन अ‍ॅपवरील अकाऊंटद्वारे माझ्याशी संपर्क साधला होता. सुरक्षा यंत्रणा आपल्यावर नजर ठेवून असल्याचे त्याने सांगितले होते. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून, आपण त्याचा फायदा उठवला पाहिजे. या आंदोलनात सहभागी होऊन हिंसाचार घडवून आणाला, असेही तो मला म्हणाला, असे आशिकने नमूद केले. हा अहमद अली म्हणजे भारतातील इसिसचा प्रमुख शफी अरमार असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला असून, तो नुकताच अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)