शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

वसतिगृहाला सांडपाण्याचा वेढा दुर्गंधीमुळे विद्यार्थी त्रस्त : आवारातच सोडले शौचालयाचे पाणी

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

कोराडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे.

कोराडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे.
नांदा-कोराडी येथे समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी नागपूर शहरात शिक्षण घेणारे १०० विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील शौचालयाच्या व सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक अंतर्गत टँक बांधली असून याच टाकीत आंघोळीचे व शौचालयाचे पाणी सोडले जाते. टाकीची क्षमता कमी असल्याने ती वारंवार ओव्हर फ्लो होते. महिनाभरापासून ही टाकी भरली असल्याने घाणयुक्त सांडपाणी बाहेर पडते. वसतिगृहाने हे दुर्गंधीयुक्त पाणी चक्क आवारातील परसबागेत सोडून स्वच्छतेचा पराक्रम केला. वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आत असलेल्या बागेत पाणी सोडल्याने तेथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या सांडपाण्यावर अळ्या तरंगताना दिसतात.
वसतिगृहालगत राहणारे बापू बावनकुळे, हेमराज चौधरी, आशिष राऊत, यशवंत खडतकर, साहेबराव सावरकर, खुशाल बेहुने, रवी चौधरी, फकीरचंद बोरकुटे, विजय विटोले आदी कुटुंबीयांना येथे राहणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना दुर्गंधीतच दिवस काढावे लागत आहेत. वाच्यता करण्याचे धाडस नसल्याने हे विद्यार्थी हा अन्याय सहन करीत आहेत. वसतिगृह सुरू झाल्यापासून नागरिकांना अनेकदा हा त्रास सहन करावा लागत आहे. गृहपालाकडे अर्ज-विनंती केली, मोर्चे काढले परंतु समस्या सोडविण्यात यश आले नाही.
ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधली आहे. बांधकाम करताना सांडपाणी व शौचालयाच्या पाण्याची विल्हेवाट लागेल, अशी पुरेशी व्यवस्था नाही. चार वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत छत गळती होते. २४ जून २०१६ ला समाजकल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्यांनाही ही समस्या दाखविण्यात आली. अत्यंत किळसवाणा प्रकार पाहिल्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास तशा सूचना केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.