शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाला सांडपाण्याचा वेढा दुर्गंधीमुळे विद्यार्थी त्रस्त : आवारातच सोडले शौचालयाचे पाणी

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

कोराडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे.

कोराडी : समाजकल्याण विभागाच्या नांदा-कोराडी येथील मुलांच्या वसतिगृहाला सर्वत्र सांडपाण्याने वेढले आहे. या वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आतमध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात आल्याने, वसतिगृहातील १०० विद्यार्थी व परिसरातील शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थ्यांसह जाणाऱ्या-येणाऱ्यांना नाकावर कापड लावल्याशिवाय वाट काढणे कठीण झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत समाजकल्याण विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदारीवरून जुगलबंदी सुरू आहे.
नांदा-कोराडी येथे समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी नागपूर शहरात शिक्षण घेणारे १०० विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील शौचालयाच्या व सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक अंतर्गत टँक बांधली असून याच टाकीत आंघोळीचे व शौचालयाचे पाणी सोडले जाते. टाकीची क्षमता कमी असल्याने ती वारंवार ओव्हर फ्लो होते. महिनाभरापासून ही टाकी भरली असल्याने घाणयुक्त सांडपाणी बाहेर पडते. वसतिगृहाने हे दुर्गंधीयुक्त पाणी चक्क आवारातील परसबागेत सोडून स्वच्छतेचा पराक्रम केला. वसतिगृहाच्या सुरक्षा भिंतीच्या आत असलेल्या बागेत पाणी सोडल्याने तेथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या सांडपाण्यावर अळ्या तरंगताना दिसतात.
वसतिगृहालगत राहणारे बापू बावनकुळे, हेमराज चौधरी, आशिष राऊत, यशवंत खडतकर, साहेबराव सावरकर, खुशाल बेहुने, रवी चौधरी, फकीरचंद बोरकुटे, विजय विटोले आदी कुटुंबीयांना येथे राहणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना दुर्गंधीतच दिवस काढावे लागत आहेत. वाच्यता करण्याचे धाडस नसल्याने हे विद्यार्थी हा अन्याय सहन करीत आहेत. वसतिगृह सुरू झाल्यापासून नागरिकांना अनेकदा हा त्रास सहन करावा लागत आहे. गृहपालाकडे अर्ज-विनंती केली, मोर्चे काढले परंतु समस्या सोडविण्यात यश आले नाही.
ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधली आहे. बांधकाम करताना सांडपाणी व शौचालयाच्या पाण्याची विल्हेवाट लागेल, अशी पुरेशी व्यवस्था नाही. चार वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत छत गळती होते. २४ जून २०१६ ला समाजकल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्यांनाही ही समस्या दाखविण्यात आली. अत्यंत किळसवाणा प्रकार पाहिल्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास तशा सूचना केल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.