शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला ३ कोटींचे भांडवल

By admin | Updated: March 17, 2017 01:16 IST

येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे

जयपूर : येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे. ‘इन्फ्युजन बेव्हरेजेस’ या नावाची त्यांची कंपनी असून, ती सुगंधी पाणी बनविते.हे तिघे जयपूरमधील नीरजा मोदी शाळेचे विद्यार्थी आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी एका उद्योजकता महोत्सवात सहभाग घेतला होता. वर्षभरातच त्यांचा उपक्रम एका कंपनीत रुपांतरित झाला आहे. चेतन गोलेच्छा याने सांगितले की, आमचे उत्पादन महोत्सवातील परीक्षकांना आवडले नव्हते. आम्ही पहिल्या फेरीतच बाद होऊन स्पर्धेबाहेर फेकले गेलो. मात्र, या महोत्सवाच्या पहिल्या एक तासातच आम्हाला १५0 बाटल्यांची आॅर्डर मिळाली. लोकांना आमचे सुगंधी पाणी आवडले होते.मृगांक गुज्जरने सांगितले की, प्रीझर्वेटिव्ह तसेच साखर आणि सोडा न वापरता सुगंधी पाणी तयार करणे ही आमची मध्यवर्ती कल्पना होती. त्यासाठी आम्ही गुगलवर खूप संशोधन केले. पण आम्ही अल्पवयीन असल्यामुळे आम्हाला कोणतीही सरकारी परवानगी मिळू शकत नव्हती. सर्व परवानग्या आम्हाला पालकांच्या नावे मिळवाव्या लागल्या.या त्रिकूटाने आयआयटी कानपूर आणि आयआयएम इंदूर यांच्या उद्योजकता स्पर्धेतही भाग घेतला. मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने त्यांना साह्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना मोठे बळ मिळाले. त्यांना पेटंट मिळण्यासाठी संस्थेने मदत केली. त्यांचा अर्ज आता अंतिम टप्प्यात आहे. केवडा, गुलाब आणि बेल यांचा सुगंध असलेले पाणी ते सध्या उत्पादित करतात. जानेवारीपर्यंत त्यांनी ८ हजार बाटल्या विकल्या आहेत. उत्सव जैन याने सांगितले की, यंदा जानेवारीत एका गुंतवणूकदाराने त्यांना इंदुरात बोलावले. बैठक यशस्वी झाली. ३ कोटींचे भांडवल पुरविण्याचे त्याने मान्य केले. करारानुसार, प्रकल्प इंदुरात राहील. त्रिकूटाकडे मार्केटिंग आणि संशोधनाची जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)