शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला ३ कोटींचे भांडवल

By admin | Updated: March 17, 2017 01:16 IST

येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे

जयपूर : येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या चेतन गोलेच्छा, मृगांक गुज्जर आणि उत्सव जैन या तीन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीला ३ कोटींचे भांडवल मिळाले आहे. ‘इन्फ्युजन बेव्हरेजेस’ या नावाची त्यांची कंपनी असून, ती सुगंधी पाणी बनविते.हे तिघे जयपूरमधील नीरजा मोदी शाळेचे विद्यार्थी आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी एका उद्योजकता महोत्सवात सहभाग घेतला होता. वर्षभरातच त्यांचा उपक्रम एका कंपनीत रुपांतरित झाला आहे. चेतन गोलेच्छा याने सांगितले की, आमचे उत्पादन महोत्सवातील परीक्षकांना आवडले नव्हते. आम्ही पहिल्या फेरीतच बाद होऊन स्पर्धेबाहेर फेकले गेलो. मात्र, या महोत्सवाच्या पहिल्या एक तासातच आम्हाला १५0 बाटल्यांची आॅर्डर मिळाली. लोकांना आमचे सुगंधी पाणी आवडले होते.मृगांक गुज्जरने सांगितले की, प्रीझर्वेटिव्ह तसेच साखर आणि सोडा न वापरता सुगंधी पाणी तयार करणे ही आमची मध्यवर्ती कल्पना होती. त्यासाठी आम्ही गुगलवर खूप संशोधन केले. पण आम्ही अल्पवयीन असल्यामुळे आम्हाला कोणतीही सरकारी परवानगी मिळू शकत नव्हती. सर्व परवानग्या आम्हाला पालकांच्या नावे मिळवाव्या लागल्या.या त्रिकूटाने आयआयटी कानपूर आणि आयआयएम इंदूर यांच्या उद्योजकता स्पर्धेतही भाग घेतला. मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने त्यांना साह्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना मोठे बळ मिळाले. त्यांना पेटंट मिळण्यासाठी संस्थेने मदत केली. त्यांचा अर्ज आता अंतिम टप्प्यात आहे. केवडा, गुलाब आणि बेल यांचा सुगंध असलेले पाणी ते सध्या उत्पादित करतात. जानेवारीपर्यंत त्यांनी ८ हजार बाटल्या विकल्या आहेत. उत्सव जैन याने सांगितले की, यंदा जानेवारीत एका गुंतवणूकदाराने त्यांना इंदुरात बोलावले. बैठक यशस्वी झाली. ३ कोटींचे भांडवल पुरविण्याचे त्याने मान्य केले. करारानुसार, प्रकल्प इंदुरात राहील. त्रिकूटाकडे मार्केटिंग आणि संशोधनाची जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)