शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:53 IST

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे.

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच नोकरीच्या मागे धावू नये, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी नोकरी मागे न धावता समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असंही त्यांनी नमूद केले. देशात वाढत्या बेरोजगारीच्या काळात योगी यांच्या या सल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मदन मोहन मालवीय टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.

दिक्षांत समारंभामुळे गुरुकुलची परंपरा जीवंत राहिली आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना नेहमी खरं बोलण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते सत्याच्या मार्गावर चालतात. योगी आदित्यनाथ म्हणाले की, इंजिनियरींगचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकतात. प्रत्येक घरासाठी नळ या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी समोर यायला हवं. ही योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून याचा उद्देश प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचं असल्याचे त्यांनी नमूद केले.

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा पुरवठा जनतेपर्यंत करणे सोपं झालं आहे. आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्यात आले.तसेच रेशन दुकानांवर सेल मशिन लावण्यात आल्याचे योगींनी सांगितले.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून मी इन्सेफेलाइटिस या आजारावर मोठं काम करत आहे. १९७७ ते २०१७ या कालावधीत या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. त्यामुळे इन्सेफेलाइटिसची लढा देण्यास मदत झाली.