शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:53 IST

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे.

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच नोकरीच्या मागे धावू नये, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी नोकरी मागे न धावता समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असंही त्यांनी नमूद केले. देशात वाढत्या बेरोजगारीच्या काळात योगी यांच्या या सल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मदन मोहन मालवीय टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.

दिक्षांत समारंभामुळे गुरुकुलची परंपरा जीवंत राहिली आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना नेहमी खरं बोलण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते सत्याच्या मार्गावर चालतात. योगी आदित्यनाथ म्हणाले की, इंजिनियरींगचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकतात. प्रत्येक घरासाठी नळ या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी समोर यायला हवं. ही योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून याचा उद्देश प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचं असल्याचे त्यांनी नमूद केले.

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा पुरवठा जनतेपर्यंत करणे सोपं झालं आहे. आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्यात आले.तसेच रेशन दुकानांवर सेल मशिन लावण्यात आल्याचे योगींनी सांगितले.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून मी इन्सेफेलाइटिस या आजारावर मोठं काम करत आहे. १९७७ ते २०१७ या कालावधीत या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. त्यामुळे इन्सेफेलाइटिसची लढा देण्यास मदत झाली.