शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:53 IST

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे.

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच नोकरीच्या मागे धावू नये, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी नोकरी मागे न धावता समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असंही त्यांनी नमूद केले. देशात वाढत्या बेरोजगारीच्या काळात योगी यांच्या या सल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मदन मोहन मालवीय टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.

दिक्षांत समारंभामुळे गुरुकुलची परंपरा जीवंत राहिली आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना नेहमी खरं बोलण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते सत्याच्या मार्गावर चालतात. योगी आदित्यनाथ म्हणाले की, इंजिनियरींगचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकतात. प्रत्येक घरासाठी नळ या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी समोर यायला हवं. ही योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून याचा उद्देश प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचं असल्याचे त्यांनी नमूद केले.

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा पुरवठा जनतेपर्यंत करणे सोपं झालं आहे. आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्यात आले.तसेच रेशन दुकानांवर सेल मशिन लावण्यात आल्याचे योगींनी सांगितले.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून मी इन्सेफेलाइटिस या आजारावर मोठं काम करत आहे. १९७७ ते २०१७ या कालावधीत या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. त्यामुळे इन्सेफेलाइटिसची लढा देण्यास मदत झाली.