शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:53 IST

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे.

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच नोकरीच्या मागे धावू नये, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी नोकरी मागे न धावता समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असंही त्यांनी नमूद केले. देशात वाढत्या बेरोजगारीच्या काळात योगी यांच्या या सल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मदन मोहन मालवीय टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.

दिक्षांत समारंभामुळे गुरुकुलची परंपरा जीवंत राहिली आहे. यामुळेच विद्यार्थ्यांना नेहमी खरं बोलण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते सत्याच्या मार्गावर चालतात. योगी आदित्यनाथ म्हणाले की, इंजिनियरींगचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकतात. प्रत्येक घरासाठी नळ या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी समोर यायला हवं. ही योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून याचा उद्देश प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचं असल्याचे त्यांनी नमूद केले.

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा पुरवठा जनतेपर्यंत करणे सोपं झालं आहे. आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्यात आले.तसेच रेशन दुकानांवर सेल मशिन लावण्यात आल्याचे योगींनी सांगितले.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून मी इन्सेफेलाइटिस या आजारावर मोठं काम करत आहे. १९७७ ते २०१७ या कालावधीत या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. त्यामुळे इन्सेफेलाइटिसची लढा देण्यास मदत झाली.